
पीएम किसान योजनेबाबत एक मोठा घोळ समोर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार भंडाऱ्यातील शेतकऱ्याच्या बँक खात्यावर फक्त एक पैसा आला आहे. खात्यावर फक्त एक पैसा आल्याने नेमका घोळ कुठे झाला, असा प्रश्न विचारला जात आहे.
केंद्र सरकार कडून पात्र शेतकऱ्यांना अर्थसहाय्य करण्यासाठी पीएम किसान योजना राबविली जाते. यात शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये दिले जातात. एकूण तीन हप्त्यांमध्ये ही रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पाठवली जाते.
देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांना हा लाभ दिला जातो. भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यात मात्र एक वेगळाच प्रकार समोर आला आहे. येथे जेवनाळा येथील लाभार्थी सेतकरी खेमराज गिऱ्हेपुंजे यांच्या बँक खात्यात फक्त एक पैसा आला आहे.
शेतकऱ्याच्या मोबाईलवर बँकेत फक्त एक पैसा जमा झाल्याचा संदेश आला आहे. त्यामुळे शेतकऱ्याकडून संताप व्यक्त होत आहे. ही आर्थिक मदत आहे, की आमची थट्टा असा सवाल आता शेतकरी करत आहेत.
दरम्यान, फक्त एक पैसा बँकेत येणे ही तांत्रिक चूक आहे की खरंच या योजनेअंतर्गत फक्त एक पैसाच शेतकऱ्याला देण्यात आला, असे विचारले जात आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर इतरही शेतकऱ्यांनी आपापली बँक खाते चेक करावे, असे आवाहन केले जात आहे.




Leave a Reply