
“माझं कर्तव्य मी पार पाडतोय. मराठा समाजाच्या कल्याणासाठी मी आमरण उपोषण करतोय. सरकार येत राहिलं, जात राहिल. चर्चा करत राहिल. मी उपोषणवर ठाम आहे. रात्रभर त्यांच्या सरकारच्या, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मराठा आरक्षण उपसमिती अध्यक्ष यांच्या बैठका रात्री झाल्याची मला माहिती आहे. त्यांचा ड्राफ्ट येईल. पण 58 लाख नोंदी निघाल्या आहेत. त्या 58 लाख लोकांना कुणबी प्रमाणपत्र देऊन वॅलिडिटी देण्यात यावी. या सूचना प्रशासनाने, शासनाने द्याव्या. आदेश शासन स्तरावर काढला पाहिजे. आदेश द्या जर प्रमाणपत्र वॅलिडिटी दिली नाही, तर तुम्हाला निलंबित करण्यात येईल. सर्व अधिकाऱ्यांपर्यंत हा आदेश पोहोचला पाहिजे. सरकारने, मुख्यमंत्र्यांनी हा आदेश काढला तर सामान्य लोक तो सूचना, आदेश दाखवतील” असं मनोज जरांगे पाटील आमरण उपोषण सुरु करताना बोलले. मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा आज पहिला दिवस आहे.
(बातमी अपडेट होत आहे)
Leave a Reply