
मुंबईत आजही उष्णतेचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. किनारपट्टी भागात दमट तापमान असून हवेतील आर्द्रता वाढली. तर राज्यात 19 तारखेपर्यंत उष्णतेची भीषण लाट असेल असा इशारा देण्यात आला आहे. राज्यातील 23 जिल्ह्यांना हवामान विभागाचा अलर्ट जारी, पारा 40-44 अंशांपर्यंत जाण्याची शक्यता असून नागरिकांनी खबरदारी घेणे अत्यावश्यक आहे असा सल्ला हवामान विभागाने दिला आहे. मुंबईतील सायन येथील इस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील पुलाच्या सांध्यांच्या (जॉइंट) दुरुस्तीचे आणि नव्या पुलाच्या कामाला सुरूवात झाली आहे. या पुलावर दररोज मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. त्यामुळे पुलाच्या सुरक्षिततेसाठी आणि वाहतुकीच्या सुरळीत प्रवाहासाठी ही दुरुस्ती आणि नवा पूल अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. अशोक खरातला आज व्हीसीद्वारे पुन्हा कोर्टासमोर सादर करण्यात येणार. लैंगिक शोषणाच्या चौथ्या गुन्ह्यातील पोलीस कोठडी आज संपणार असून नव्या गुन्ह्यांच्या ताब्यासाठी अर्ज दाखल होणार आहे. यासह महाराष्ट्र, देश-विदेश, क्रीडा, मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी दिवसभर हा ब्लॉग फॉलो करत रहा.
Leave a Reply