
महिलांना विधीमंडळात आणि संसदेत 33 टक्के आरक्षण देणारे नारी शक्ती वंदन विधेयकावरून रणकंदन सुरू आहे. हे विधेयक जनगणनेनंतर सादर करण्याची मागणी विरोधकांची आहे. तर केंद्र सरकार ते आताच रेटत आहे. पाच राज्यांच्या निवडणुकीच्या रणधुमाळीत केंद्र सरकार हे विधेयक मंजूर करू इच्छित असल्याचा आणि सरकारचा हेतू योग्य नसल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. यासोबतच विधीमंडळ आणि संसदेतील खासदार आणि आमदारांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. त्यासाठीचे परिसीमन विधेयकही सादर होणार आहे. तर नाशिकमधील आयटी कंपनीतील कारनामे एकमागून एक समोर येत आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सध्या पश्चिम बंगालच्या रणधुमाळीत उतरले आहेत. तर राहुरी आणि बारामती पोटनिवडणुकीत प्रचार सुरू आहे. यासह राज्यातील इतर ठळक घडामोडी इथे वाचा
Leave a Reply