• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

IPL 2026: यशस्वी जयस्वालने टीम बदलण्याची गरज? कोणी दिला राजस्थान सोडण्याचा सल्ला?

May 28, 2026 by admin Leave a Comment

आयपीएल 2026 स्पर्धेच्या क्वॉलिफायर 2 फेरीत राजस्थान रॉयल्सने धडक मारली आहे. एलिमिनेटर सामन्यात सनरायझर्स हैदराबादला पराभवाची धूळ चारली आणि पुढच्या फेरीचं तिकीट मिळवलं. आता अंतिम फेरीत जागा मिळवण्यासाठी क्वॉलिफायर 2 फेरीत गुजरात टायटन्सला पराभूत करणं आवश्यक आहे. असं असताना राजस्थान रॉयल्सचा स्टार ओपनर यशस्वी जयस्वाल चर्चेत आला आहे. कारण त्याला संघ बदलण्याचा सल्ला देण्यात आला आहे. यशस्वी जयस्वालला हा सल्ला दुसरा तिसरा कोणी नाही तर टीम इंडियाचा माजी फलंदाज अंबाती रायुडू याने दिला आहे. त्याच्या मते वैभव सूर्यवंशीच्या झंझावातामुळे त्याचं यश झाकलं जात आहे. या पर्वात वैभव सूर्यवंशीच्या कामगिरीची चर्चा होत आहे. त्याने आक्रमक खेळी करून संघाला विजयाच्या वेशीवर आणून सोडलं आहे. एलिमिनेटर सामन्यात यशस्वी जयस्वालने 29 चेंडूत 97 धावा केल्या. तर जयस्वालने 29 चेंडू खेळले आणि 29 धावाच करू शकला. त्यामुळे यशस्वीला विचार करण्याची गरज आहे.

आयपीएल स्पर्धेत यशस्वी जयस्वालने आक्रमक खेळी केली नाही असं नाही. त्याने काही सामन्यात आक्रमक फटकेबाजी केली. पण वैभव सूर्यवंशीच्या झंझावातापुढे त्याची खेळी फिकी वाटत आहे. मागच्या पर्वात यशस्वी जयस्वालला जितकी लाईमलाईट मिळाली. ती आता पूर्णपणे वैभव सूर्यवंशीकडे वळली आहे. त्यामुळे यशस्वी जयस्वालचं यश फिकं पडताना दिसत आहे. असं असताना अंबाती रायुडू याने ईएसपीएल क्रिकइंफोच्या कार्यक्रमात, यशस्वी जयस्वालला टीम सोडण्याचा सल्ला दिला. कारण अशा स्थितीत वैभव सूर्यवंशीसोबत फलंदाजी करू शकत नाही. कारण जयस्वाल एक स्टार फलंदाज आहे. त्यामुळे प्रत्येक वेळी वैभवच्या यशामुळे त्याची कामगिरी झाकली जाण्याची शक्यता आहे.

अंबाती रायुडूच्या मते, यशस्वी जयस्वालने आता राजस्थान रॉयल्स संघ सोडून दुसऱ्या संघाची कास धरली पाहीजे. कारण त्याच्याकडे आपल्या ताकदीवर सामना जिंकवण्याची क्षमता आहे. त्यामुळे त्याला तशाच संघाची गरज आहे. त्या संघात त्याचा स्टार फलंदाज म्हणून दर्जा राहील. रायुडूने पुढे सांगितलं की, वैभव ज्या पद्धतीने फलंदाजी करत आहे. त्याच्यासोबत एका अनुभवी ओपनिंग पार्टनरची गरज आहे. हा फलंदाज आक्रमक फलंदाजीच्या बाबतीत 15 वर्षांच्या फलंदाजाशी तुलना करणार नाही. त्याचा नैसर्गिक खेळ करू शकेल. अंबाती रायुडूच्या मते, यशस्वी जयस्वालसाठी मुंबई इंडियन्स हा संघ योग्य ठरू शकेल. पण आता तसं काही होईल का हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • अमेरिकेने बंदी उठवली, आता इराण संपूर्ण जगाला तेल विकणार, भारताला होणार मोठा फायदा
  • IPL 2027: ऋषभ पंतने आयपीएल संघ बदलताच मोठा फटका, आता 27 कोटी नाही तर इतके पैसे मिळणार
  • महाभयंकर संकट आलं! नासाच्या नव्या अंदाजाने झोप उडाली, पावसाविषयी मोठं भाकित
  • शर्वरी वाघच्या घायाळ अदांवर खिळल्या चाहत्यांच्या नजरा,ग्लॅंमरस फोटो पाहून म्हणाल…
  • India vs Ireland: आयर्लंड-इंग्लंड दौऱ्यापूर्वी टीम इंडियाचा प्रॉब्लेम सुटला, सूर्यांश शेडगेची एन्ट्री

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in