• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

IPL 2026: मुंबई इंडियन्स संघात धुसफूस? पराभवानंतर हार्दिक पांड्याचा संताप, कोणाला काढणार बाहेर?

April 17, 2026 by admin Leave a Comment


आयपीएल 2026 स्पर्धेतील पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने विजय मिळवला आणि सहाव्या जेतेपदाची आस लावली. पण त्यानंतर मुंबई इंडियन्सची गाडी रूळावरून घसरली. सलग चौथ्या सामन्यात मुंबई इंडियन्सला पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. पाचव्या सामन्यात पंजाब किंग्सने मुंबई इंडियन्सला सहज पराभूत केलं. मुंबईने पंजाबसमोर विजयासाठी 196 धावांचं टार्गेट ठेवलं होतं. पण पंजाबने 16.3 षटकात 7 गडी गमवून हे आव्हान गाठलं. या सामन्यात मुंबई इंडियन्सचे गोलंदाज पुरते हतबल दिसून आले. पंजाब किंग्सने मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांना फोडून काढलं. या पराभवासह मुंबई इंडियन्स संघ तळाशी पोहोचला आहे. नवव्या स्थानावर मुंबई इंडियन्स घसरला आहे. त्यामुळे मुंबईची प्लेऑफचं वाट प्रत्येक पराभवानंतर बिकट होत जाणार आहे. असं असताना चौथ्या पराभवानंतर हार्दिक पांड्याने एक मोठं विधान केलं आहे. त्याने खेळाडूंच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.

मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याने संघाच्या कामगिरीवर निराशा व्यक्त करत सांगितलं की, ‘आम्ही काही कठोर प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतील. आम्हाला काही कठोर निर्णय घ्यावे लागतील की तसंच ठेवायचं की सर्व सुधारेल अशी आशा करावी? हे काही कठोर प्रश्न आहेत त्याची उत्तरं द्यावी लागतील आणि यासाठी जबाबदारी घ्यावी लागेल.’ हार्दिक पांड्याने पुढे सांगितलं की, ‘मला आत्ता जास्त काही बोलायचं नाही. आपल्याला पुन्हा नव्याने विचार करून पाहावं लागेल की आपल्यात कुठे कमतरता आहे. ही वैयक्तिक समस्या आहे, सांघिक समस्या आहे की नियोजनाची समस्या आहे? आपण एकत्र बसून यावर चर्चा करू आणि पुढे काय करता येईल हे ठरवू.’

सूर्यकुमार आणि बुमराहला संघातून वगळणार?

आयपीएल 2026 स्पर्धेतील मुंबई इंडियन्सच्या सुमार कामगिरीला काही खेळाडू जबाबदार असल्याचं हार्दिक पांड्याच्या विधानातून दिसून येत आहे. त्यामुळे पुढच्या सामन्यात कोण प्लेइंग 11च्या बाहेर जाईल याची चर्चा रंगली आहे. कारण जसप्रीत बुमराहला पाच सामन्यात एकही विकेट मिळालेली नाही. तर सूर्यकुमार यादव पूर्णपणे फेल गेला आहे. त्यामुळे या स्टार खेळाडूंना विश्रांती देऊन नवा संघ बांधला जाईल का? असाही प्रश्न क्रीडाप्रेमींना पडला आहे. पण हार्दिक पांड्याच्या वक्तव्यातून पुढच्या सामन्यात काही तरी मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Amravati Case | मित्राला मुलींचे घाणेरडे व्हिडीओ पाठवायचा नंतर… आरोपींमध्ये वाद अन् परतवाडातील अत्याचार प्रकरण उघडकीस
  • उन्हाळ्यात EV ची रेंज कमी होतेय? ‘या’ 5 सोप्या टिप्सने वाढवा बॅटरी बॅकअप
  • आरसीबीच्या सामन्यात लाखो रुपयांचा गैरव्यवहार, कँटिनमध्ये काम करणाऱ्यावर खळबळजनक आरोप
  • अशोक खरात प्रकरणी प्राजक्ता माळीकडून मुख्यमंत्र्यांचं कौतुक, सुषमा अंधारे भडकल्या, म्हणाल्या- हे हास्यजत्रेपेक्षा..
  • Walmik Karad Health Update | संतोष देशमुख हत्या प्रकरणाबाबत मोठी अपडेट समोर, मुख्य आरोपीची तब्येत बिघडली

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in