
टीम इंडियाने आयसीसी वुमन्स टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील 18 व्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेसमोर 159 धावांचं आव्हान ठेवलं आहे. भारतीय महिला संघाने 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 158 रन्स केल्या. मँचेस्टरमध्ये आयोजित या सामन्यात भारतासाठी पहिल्या 7 फलंदाजांना चांगली सुरुवात मिळाली. मात्र त्यापैकी एकाही फलंदाजाला भारतासाठी मोठी खेळी करता आली नाही. त्यामुळे भारताला 8 च्या रनरेटनेही धावा करता आल्या नाहीत. मात्र त्यानंतरही टीम इंडिया हा सामना जिंकणार, असं आम्ही नाही तर टीम इंडियाची आकडेवारी सांगते. नक्की ही आकडेवारी काय आहे? हे जाणून घेऊयात.
टीम इंडियाची बॅटिंग
टीम इंडियाने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. भारतासाठी सलामीवीर शफाली वर्मा हीने सर्वाधिक 31 धावा केल्या. दीप्ती शर्मा हीने 29 धावांची निर्णायक खेळी केली. कर्णधार हरमनप्रीत कौर हीने 24 धावांचं योगदान दिलं. शफाली, दीप्ती आणि हरमनप्रीत या तिघींव्यतिरिक्त एकीलाही 20 पार पोहचता आलं नाही. स्मृती मंधाना हीने 17 रन्स केल्या. ऋचा घोष आणि यास्तिका भाटीया या दोघींनी प्रत्येकी 15-15 धावांचं योगदान दिलं. तर जेमीमाह रॉड्रिग्स हीने 12 रन्स करुन मैदानाबाहेरचा रस्ता धरला. तर अरुंधती रेड्डी आणि डेब्युटंट प्रेमा रावत या दोघींनी शेवटच्या क्षणी महत्वपूर्ण धावा जोडल्या. अरुंधतीने नाबाद 6 तर प्रेमाने नॉट आऊट 3 रन्स केल्या.
दक्षिण आफ्रिकेसाठी शबनिम इस्माईल आणि मारीजान काप या दोघींनी प्रत्येकी 2-2 विकेट्स मिळवल्या. तर मलाबा, अयाबोंगा खाका आणि नादीन डी क्लर्क या दोघींनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली.
टीम इंडिया जिंकणार!
टीम इंडियाने टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेत 130 धावा केल्या आहेत तेव्हा तेव्हा विजय मिळवला आहे. भारताने एकूण 13 वेळा टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेत 130 पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. भारताने या 13 वेळा विजय मिळवला आहे. तसेच दक्षिण आफ्रिकेचा टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेत सर्वोच्च 135 धावांचा यशस्वी पाठलाग करण्याचा विक्रम आहे. दक्षिण आफ्रिकेने 2024 साली ऑस्ट्रेलिया विरुद्ध ही कामगिरी केली होती. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेला टीम इंडिया विरुद्ध जिंकायचं असेल तर 24 धावा जास्त कराव्या लागतील. त्यामुळे दक्षिण आफ्रिका टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेत आपला सर्वोच्च धावसंख्येचा यशस्वी पाठलाग करण्याचा विक्रम मोडीत काढणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
Leave a Reply