
आयसीसी वुमन्स टी20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील 23 व्या सामन्यात टीम इंडियासमोर बांगलादेशचं आव्हान आहे. दोन्ही संघांचा हा चौथा आणि उपांत्य फेरीच्या हिशोबाने अत्यंत महत्त्वाचा सामना आहे. दोन्ही संघांनी 3 पैकी 2 सामने जिंकले आहेत. तर 1-1 सामना गमावला आहे. त्यामुळे उपांत्य फेरीच्या समीकरणानुसार भारताला हा सामना कोणत्याही स्थितीत जिंकावा लागणार आहे. त्यामुळे टीम इंडिया या अटीतटीच्या सामन्यात बांगलादेश विरुद्ध कशी कामगिरी करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या सामन्यातील अपडेट लाईव्ह ब्लॉगद्वारे जाणून घेणार आहोत.
Leave a Reply