
तिलक वर्मा याच्या नेतृत्वात इंडिया ए टीमने धमाका केला आहे. इंडिया ए टीमने वनडे ट्राय सीरिज (Tri Nation A Series in Sri Lanka 2026 ) जिंकली आहे. टीम इंडियाने अंतिम सामन्यात यजमान श्रीलंकेवर (India A vs Sri Lanka A Final) एकतर्फी विजय मिळवत सीरिज आपल्या नावावर केली आहे. दांबुल्यातील रनगिरी आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये सामन्याचं आयोजन करण्यात आलं होतं. भारतीय फलंदाजांनंतर गोलंदाजांनी आपली भूमिका चोखपणे पार पाडली आणि विजयी करण्यात योगदान दिलं. वैभव सूर्यवंशी हा या विजयाचा हिरो ठरला. वैभवने केलेल्या कामगिरीसाठी त्याला सामनावीर पुस्कारने गौरवण्यात आलं. सामन्यात नक्की काय झालं? हे जाणून घेऊयात.
Leave a Reply