• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

BCL 2026: यूपी बृज स्टार्सने पटकावलं जेतेपद, गुजरात डायमंड्स अंतिम सामन्यात पराभव

June 14, 2026 by admin Leave a Comment

बिग क्रिकेट लीग स्पर्धेच्या दुसऱ्या पर्वात जेतेपदाचा मानकरी ठरला तो यूपी बृज स्टार्स संघ… या स्पर्धेचा अंतिम सामना ग्रेटर नोएडाच्या शहीद विजय सिंह पथिक स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्य़े पार पडला. या सामन्यातक यूपी बृज स्टार्सने गुजरात डायमंड्सला पाच धावांनी पराभूत केलं. पण हा सामना यूपी बृज स्टार्सने सहज जिंकला नाही, तर विजयासाठी खूप घाम गाळावा. गुजरात डायमंड्सने शेवटच्या षटकांपर्यंत यूपी स्टार्सला विजयासाठी झुंजवलं. अखेर या अतितटीच्या सामन्यात यूपी बृज स्टार्सने 5 धावांनी विजय मिळवला. नाणेफेकीचा कौल गुजरात डायमंड्सच्या बाजूने लागला होता. त्यांनी प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि यूपी बृज स्टार्सला फलंदाजीचं निमंत्रण दिलं. यूपी बृज स्टार्सने 20 षटकात 8 गडी गमवून 166 धावा केल्या. यूपी बृज स्टार्सकडून चिराग गांधीने सर्वाधिक धावा केल्या. त्याने 46 चेंडूत 76 धावा केल्या. त्याच्या या खेळीमुळे यूपी बृज स्टार्सचा विजय झाला असं म्हणायला हरकत नाही.

गुजरात डायमंड्सचा डाव

बिग क्रिकेट लीग टी20 स्पर्धेत यूपी बृज स्टार्सने विजयासाठी दिलेल्या 167 धावांचा पाठलाग करताना गुजरात डायमंड्स सघ फक्त 161 धावा करू शकला. हा सामना यूपी बृज स्टार्सने 5 धावांनी जिंकला. गुजरात डायमंड्सकडून जेसल कारियाने 40 चेंडूत 48 धावा केल्या. तर एडेला गुरूरत्नेने 25 चेंडूत 35 धावांची खेळी केली. पण विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचू शकले नाहीत.

अंतिम सामन्यात बजर चॅलेंज

अंतिम सामन्यात काही रोमांचक असे बजर चॅलेंज पाहायला मिळेल. हार्दिकने दोन वेळा सलग तीन निर्धाव चेंडू टाकण्याचं चॅलेंज घेतलं. मनोजने 30 धावांचं चॅलेंज घेतलं होतं. तर विशाल गुर्जर आणि जतिन सैनीने तीन डॉट चेंडू टाकण्याचं आव्हान घेतलं. जतिन मावीने विकेट आणि तीन विकेटचं चॅलेंज स्वीकारलं. त्याने तीन विकेटचं चॅलेंज यशस्वीरित्या पूर्ण केलं आणि अंतिम फेरीत छाप सोडली.

अंतिम सामना पाहण्यासाठी मनोज तिवारी आणि किरेन रिजिजू यांच्यासारखे अनेक मान्यवर स्टेडियममध्ये उपस्थित होते. भाजप नेते मनोज तिवारी म्हणाले, “बिग क्रिकेट लीग देशभरातील उदयोन्मुख क्रिकेटपटूंसाठी एक उत्कृष्ट व्यासपीठ ठरली आहे. संपूर्ण स्पर्धेदरम्यान खेळाडूंचा जोश आणि स्पर्धात्मक वृत्ती प्रेरणादायी ठरली आहे. खेळाडूंना आपली क्षमता दाखवण्याची आणि आपली स्वप्ने साकार करण्याची अशी संधी मिळणे, ही त्यांच्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे.”

केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांच्या मते, “राष्ट्र उभारणीत खेळ महत्त्वाची भूमिका बजावतात आणि बिग क्रिकेट लीगसारखे उपक्रम तळागाळातील क्रीडा प्रतिभा जोपासण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान देतात. खेळाडू आणि प्रेक्षकांचा उत्साह भारताच्या सशक्त क्रीडा परिसंस्थेचे प्रतिबिंब आहे.” सोमेंद्र तोमर म्हणाले की, “बिग क्रिकेट लीग ही केवळ एक स्पर्धा नाही, तर क्रिकेट आणि क्रीडा उत्कृष्टतेचा एक उत्सव आहे. या अंतिम सामन्याने देशाच्या विविध भागांतील प्रतिभावान खेळाडूंना एकत्र आणले आहे, ज्यामुळे त्यांना मौल्यवान अनुभव आणि संधी मिळाल्या आहेत.”

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • अमेरिकेने बंदी उठवली, आता इराण संपूर्ण जगाला तेल विकणार, भारताला होणार मोठा फायदा
  • IPL 2027: ऋषभ पंतने आयपीएल संघ बदलताच मोठा फटका, आता 27 कोटी नाही तर इतके पैसे मिळणार
  • महाभयंकर संकट आलं! नासाच्या नव्या अंदाजाने झोप उडाली, पावसाविषयी मोठं भाकित
  • शर्वरी वाघच्या घायाळ अदांवर खिळल्या चाहत्यांच्या नजरा,ग्लॅंमरस फोटो पाहून म्हणाल…
  • India vs Ireland: आयर्लंड-इंग्लंड दौऱ्यापूर्वी टीम इंडियाचा प्रॉब्लेम सुटला, सूर्यांश शेडगेची एन्ट्री

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in