
राजकारणात कधी काय घडेल सांगता येत नाही. मात्र शिवसेनेतील संजय शिरसाट यांनी अलीकडेच केलेल्या एका विधानामुळे राजकारणातील अस्थिरतेच्या चर्चांना उधाण आलं आहे.
शिवसेना शिंदे गटातील संजय शिरसाट यांनी माध्यमांसमोर बोलताना सांगितले की, ‘तुम्ही एका जागेसाठी शिवसेना-भाजपची युती तुटताना पाहिली आहे. त्यामुळे राजकारणात कधीही बॉण्ड किंवा ॲग्रीमेंटसारखं काही केलेलं नसतं. असं शक्य आहे की 2029 ची निवडणूक भाजप शिवसेना स्वबळावर लढतील. राजकारणात काही नक्की नसतं. असं ठरवलेलं नसतं आगामी निवडणूक आम्ही अशीच लढवायची तशीच लढवायची. महत्त्वाची बाब म्हणजे, प्रत्येक पक्षाची एक वेगळी पद्धत असते. तयारी असते ‘
संजय शिरसाट यांच्या या वक्तव्यामुळे सध्या अनेक चर्चांना उधाण आलं आहे. यामुळे आगामी काळात नेमकं काय काय घडू शकतं हे पाहणं आता महत्त्वाचं ठरतंय.
Leave a Reply