• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

ललित मोदी यांनी भारतातून का पलायन केले ? म्हणाले मला दाऊदने तिनदा…

June 4, 2026 by admin Leave a Comment

इंडियन प्रीमियर लिग ( आयपीएल ) चे संस्थापक ललित मोदी यांनी एक खळबळजनक मुलाखत दिली आहे. त्यांनी या मुलाखतीत आपण २०१० मध्ये भारतातून कायद्याच्या अडचणींमुळे नाही तर आपल्या जीवाला धोका असल्यानेच पलायन केल्याचे म्हटले आहे. ललित मोदी यांनी अँकर करिष्मा मेहता हिला दिलेल्या मुलाखतीत आपली बाजू मांडली आहे. आपण त्या रात्री तातडीने मुंबईहून लंडनला जाणारी फ्लाईट का पकडली ? याची कहाणी सांगितली आहे.

आयपीएलचे संस्थापक ललित मोदी यांनी दावा केला आहे की त्यांनी साल २०१० मध्ये कायदेशीर प्रकरणांमुळे नव्हे तर अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्याकडून मिळालेल्या धमक्यांमुळे भारत सोडला होता. त्यांनी या मुलाखतीत सांगितले की मॅच फिक्सिंगच्या विरोधातील आपल्या कठोर धोरणाने दाऊद आपल्या जीवाच्या मागे लागला होता. ललित मोदी यांनी या प्रकरणात असाही दावा केला आहे की ते पळपूटे नाहीत आणि त्यांच्या विरोधात कोणत्याही कोर्टात केस चालू नाहीए…

त्या रात्री काय झाले ? ललित मोदीने कसा भारत सोडला ?

एंकर करिश्मा यांनी ललित मोदी यांना विचारले की त्या दिवसाबद्दल तुम्ही सांगू शकता का ? ज्या दिवशी तुम्ही भारत सोडला. यावर ललित मोदी यांनी सांगितले की तो दिवस खूपच माझ्यासाठी खूप कठीण दिवस होता. मला आठवतंय त्या दिवशी मी गोव्याला गेलो होतो. तेथे मी माझ्या लिगल टीम सोबत होतो. कारण बीसीसीआयने मला कारण दाखवा नोटीस बजावली होती. माझ्या सोबत गोव्यात २० वकीलांची टीम होती. आम्ही एका पार्क मध्ये गेलो.बीसीसीआयला उत्तर देण्यासाठी मला माझे उत्तर ड्राफ्ट करायचे होते. त्यानंतर मला गोव्याहून मुंबईत परतायचे होते. तोपर्यंत दाऊदने मला मारण्याचे तीनदा प्रयत्न केले होते. त्यामुळे माझी सिक्युरिटी तगडी होती. माझ्या सोबत २४ तास ४० ते ५० गार्ड्स मशीनगनसह तैनात असायचे. तेव्हा मला माहिती नव्हते की मला देश सोडावा लागेल, माझा कोणताही प्लान तसा नव्हता. बीसीसीआयला उत्तर फाईल केल्यानंतर मी मुंबईला पोहचलो.

मी पाहिले बाहेर कोणीच नव्हते…

मोदी यांनी सांगितले की, ‘बीसीसीआयला उत्तर ड्राफ्ट केल्यानंतर मी गोव्याहून मुंबईला पोहचलो. तेव्हा सायंकाळचे साडे पाच वाजले होते. सर्वसाधारणपणे माझ्या कार मला घेण्यासाठी थेट एअरक्राफ्टपर्यंत येतात. चारी बाजूंनी पहारा असतो. जेव्हा माझे विमान पोहचले तेव्हा,आम्ही एका रिमोट पार्किंगमध्ये उभे होतो. मी पाहिले बाहेर कोणीच नव्हते…  मी विचारात पडलो, माझे बॉडीगार्ड आणि सुरक्षारक्षक कोठे आहेत ? हत्यारांनी सुसज्ज असलेल्या कार नव्हती. मी सर्वांना फोन लावायला सुरुवात केली. परंतू सर्वांचे फोन स्विच ऑफ होते. तेव्हा माझ्या खाजगी सुरक्षारक्षकाला सांगितले की खाली जाऊ पाहा काय गडबड आहे ? त्याने बाहेर जाऊन चेक केले आणि पुन्हा येऊन मला सांगितले की तुम्ही माझ्यासोबत चला. मी म्हणालो की कुठे ? तेव्हा एअरपोर्टवर एक बॅक गेट असायचे.नंतर आम्ही बाहेर निघालो आणि माझा बॉडीगार्ड म्हणाला बाथरुमला जाऊया.’

फोर सिजन्स हॉटेलपर्यंत मला सुरक्षित पोहचवले

ललित मोदी यांनी पुढे सांगितले की हिमांशु रॉय, जे त्यावेळी पोलीस आयुक्त होते, ते एअरपोर्टवर माझी वाट पहात होते. त्यांनी मला सांगितले की आम्ही आता तुमचे संरक्षण करु नाही शकत. केवळ पुढच्या काही तासांपर्यंत तुमचे संरक्षण करु शकतो. आम्ही एअरपोर्टपासून तुमच्या हॉटेलपर्यंत तुमच्या सुरक्षेची गॅरंटी घेऊ शकतो. मात्र, माझा सल्ला आहे की या नंतर तुम्ही विचार करा पुढे काय करायचे आहे. त्यानंतर मुंबईच्या फोर सिजन्स हॉटेलपर्यंत मला सुरक्षित पोहचवण्यात आले.

मी लंडनला जाण्याचा निर्णय घेतला

तेथे हॉटेलवर गेलो तर तेथे माझे कुटुंब होते, संपूर्ण लॉबी लोकांनी भरली होती. माझे स्वत:चे ४० ते ५० बॉडीगार्ड होते. मी अनेक लोकांना कॉल लावले. मी हे सांगणार नाही कोणाला लावले, हे मी माझ्या बायोपिकसाठी राखून ठेवले आहे. मला सांगितले गेले की माझ्या जीवाला भारतात धोका आहे. माझ्याकडे दोन पर्याय होते एक तर गोळी खायची किंवा भारतातून निघायचे. माझ्यावर भारतात कोणतेही प्रकरण सुरु नव्हते, मी लंडनला जाण्याचा निर्णय घेतला. मध्यरात्री ब्रिटीश एअरवेजच्या विमानात जाऊन बसलो. कारण माझ्या जीवाला धोका होता. त्यानंतर दीड वर्षांनी भारत सरकारने सांगितले की माझा पासपोर्ट जप्त केला आहे. तेव्हा मी संपूर्ण जग फिरत होतो. त्यामुळे जेव्हा कोणी असे म्हणते की भारतातून पळालेलो आहे. मी असे मानत नाही असेही ललित मोदी यांनी या मुलाखती म्हटले आहे.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Cancer : आहारातून हे पदार्थ आजच वगळा, कॅन्सरचा वाढवतात धोका..
  • शरद पवारांना पुन्हा मोठा हादरा? 3 दिवस नॉट रिचेबल असणारा माजी मंत्री भाजपच्या वाटेवर? राष्ट्रवादीत खळबळ
  • Ketan Agarwal Murder : एफआयरमध्ये आरोपच नाही, वकिलाचा सर्वात मोठा दावा; केतन अग्रवाल प्रकरणात मोठा ट्विस्ट
  • ‘त्या’ दिवशी सियाच्या प्रियकराचे इंटरनेट बंद… दिवसभर काय घडलं? केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणात मोठा खुलासा
  • समृद्धीवर फॉर्च्युनरची ट्रकला धडक, मुंबई-गोवा मार्गावर थारचा चक्काचूर, चार विविध अपघातात एकूण पाच ठार

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in