• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

राज्यातील नगरपरिषदा- नगरपंचायतीच्या ३८ रिक्त जागांची मतदान प्रक्रिया संपन्न,उद्या सकाळी १० वाजल्यापासून मतमोजणी

June 20, 2026 by admin Leave a Comment


राज्यातील १४ जिल्ह्यांतील ८ नगरपरिषदा आणि १४ नगरपंचायतींमधील एकूण ४७ रिक्त पदांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. नामनिर्देशनपत्रे माघारी घेतल्यानंतर १० जिल्ह्यांतील ७ नगरपरिषदा आणि ७ नगरपंचायतींसाठी एकूण ३८ रिक्त जागांसाठी शनिवारी २० जून २०२६ रोजी मतदान घेण्यात आले. या निवडणुकीत सरासरी ७१.८४ टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज असल्याची माहिती राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिली आहे.

आज स. ७.३० ते सायं. ५.३० या वेळेत झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर नगरपरिषद – नगरपंचायतीकरिता ८१.४९ टक्के, नाशिक जिल्ह्यातील मनमाड नगरपरिषद-नगरपंचायतीकरिता ६६.५२ टक्के, बीड जिल्ह्यातील गेवराई नगरपंचायत -नगरपरिषदेकरिता ७६.३३ टक्के आणि अकोला जिल्ह्यातील पातूर नगरपंचायत-नगरपरिषदेकरिता ७३.३३ टक्के तर अकोट नगरपंचायत- नगरपरिषदेकरिता ६७.३१ टक्के मतदान झाले. या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये सरासरी ७२.१२ टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

तसेच, आज झालेल्या पोटनिवडणुकांमध्ये रायगड जिल्ह्यातील पाली नगरपरिषद-नगरपंचायतीकरिता ८५.३० टक्के, नाशिक जिल्ह्यातील पेठ नगरपरिषद- नगरपंचायतीकरिता ८४ टक्के, लातूर जिल्ह्यातील अहमदपूर नगरपरिषद -नगरपंचायतीकरिता ६४.५४ टक्के, वाशिम जिल्ह्यातील मानोरा नगरपरिषद – नगरपंचायतीकरिता ७७.५७ टक्के आणि नागपूर जिल्ह्यातील हिंगणा नगरपरिषद -नगरपंचायतीकरिता ७६.३१ टक्के मतदान झाले.

गडचिरोली जिल्ह्यातील गडचिरोली नगरपरिषद – नगरपंचायतीकरिता ७५.०१ टक्के, कुरखेडा नगरपरिषद-नगरपंचायतीकरिता ८०.३७ टक्के आणि अहेरी नगरपरिषद-नगरपंचायतीकरिता ६१.५० टक्के मतदान झाले. गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी नगरपरिषद – नगरपंचायतीमध्ये ७४.८५ टक्के मतदानाची नोंद झाली. या नगरपंचायत व नगरपरिषदांच्या पोटनिवडणुकांमध्ये सरासरी ७१.५५ टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

८ जागा बिनविरोध निवडून आल्या

राज्यातील १४ जिल्ह्यांतील ८ नगरपरिषदा आणि १४ नगरपंचायतींमधील एकूण ४७ रिक्त जागांपैकी ८ जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत. तसेच, तीर्थपुरी नगरपंचायतीतील पोटनिवडणुकीसाठी एकही नामनिर्देशनपत्र प्राप्त झाले नसल्याने उर्वरित ३८ जागांसाठी सार्वत्रिक आणि पोटनिवडणुका घेण्यात आल्या. यासाठी राज्यभरातील ५१ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडली.

सार्वत्रिक तसेच पोटनिवडणुकांची संपूर्ण प्रक्रिया शांततेत आणि सुरळीत पार पडली असून कोणतीही अनुचित घटना घडली नाही. मतदान संपल्यानंतर सर्व मतदान केंद्रांवरील मतदान यंत्रे सीलबंद करून सुरक्षा कक्षात जमा करण्यात आली आहे. या निवडणुकांची मतमोजणी उद्या, २१ जून रोजी सकाळी १० वाजल्यापासून करण्यात येणार असल्याची माहिती राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिली.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Ketan Agarwal Case: मोठी अपडेट! पोलिसांसमोर सिया गोयलने थेट… केतन अग्रवाल प्रकरणात खळबळजनक माहिती
  • प्रिन्स ठरला किंगपेक्षा भारी, ICC वनडे रँकिंगमध्ये गिलचा फायदा, तर कोहली मोठे नुकसान
  • आचार्य चाणक्य म्हणतात, शक्य तितक्या गोष्टी गोपनीय ठेवा…, कोणावर आंधळेपणाने विश्वास ठेवताना ‘हे’ विचार नक्की करा
  • 15 लाख घरांची मोठी घोषणा! जयकुमार गोरेंचं विधानसभेत मोठं आश्वासन, म्हणाले…
  • Ketan Agarwal Murder Case : पळून जाऊन सियाशी लग्न का केलं नाही? केतनला मारलंच का? चेतनचं उत्तर ऐकून सर्वच हादरले…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in