• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

या देशात फोन, सायकल आणि लगेज लॉक न लावता ठेवतात, कारण रंजक

June 22, 2026 by admin Leave a Comment


आजच्या कलियुगात तुमचे पाकिट आणि मोबाईल कधी प्रवासात लंपास होईल याची गॅरंटी नसते.लोकल ट्रेनच्या प्रवासात सतत आपले लक्ष पाकिट आणि मोबाईलच्या सुरक्षेकडे असते. अशा या घोर कलियुगात देवस्थानातील गर्दीत, मोठ्या सोहळ्यात, जेथे गर्दी जमते तेथे पाकिटमार हमखास हातसाफ करुन जातात. मात्र, एक देश असा आहे ज्या देशात फोन, सायकल आणि बॅग सामान लोक लॉक न लावता सोडून देतात. तरी त्यांची चोरी होत नाही.सोशल मीडियावर या देशाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. युजर्स त्यावर अनेक कमेंट करत आहेत.

या एका व्यक्तीने सांगितले की गेल्या एक महिन्यांपासून पत्नी आणि मुलीसोबत ते दक्षिण कोरियात रहात आहेत. त्यांनी लिहिलेय की जर एखाद्या दुकानात वा रेस्टॉरंटमध्ये तुम्ही गेला तर बेबी स्ट्रोलर बाहेरच सोडून जातात. एकदा ते त्यांच्या मित्रासह एकत्र लंचला गेले, तेव्हा मित्राने सायकलला टाळा न लावता तशीच सोडली आणि दोन तासानंतर ते आले तेव्हा सायकल तिथल्या तिथे उभी होती.

त्यांनी आणखी एका घटनेचा उल्लेख करताना सांगितले की त्यांच्या एका मित्राचा iPhone पार्कच्या बँच वर विसरुन गेला होता. जेव्हा चार तासांनंतर ते तेथे पोहचले तर त्यांचा फोन त्याच जागेवर सापडला. एवढेच नाही त्यांना एका K-pop कॉन्सर्टच्या बाहेर अनेक लोकांच्या साहित्य कोणत्याही सुरक्षेशिवाय पडलेले आढळले. लोक त्यांचे लगेज मेट्रो स्टेशनच्या बाहेर सोडून आरामात कॉन्सर्टला गेले होते. जेव्हा त्यांनी स्थानिक लोकांना विचारले की तुम्हाला चोरांची भिती वाटत नाही का तर त्यांना उत्तर मिळाले की अखेर कोणी कशाला या वस्तूंची चोरी करले.

पोस्टमध्ये या व्यक्तीने लिहिलंय की दुसऱ्या देशात या स्थितीची कल्पना देखील करणे कठीण आहे. त्यांच्या मते दक्षिण कोरिया सारख्या हाय – ट्रस्ट समाजात कायदा आणि सामाजिक नियमांचे आदर केला जातो. तेथे छोट्या-मोठ्या चोरीला देखील गंभीरतेने घेतले जाते.

युजर काय म्हणाले ?

सोशल मीडियावर या पोस्टवर अनेक लोकांनी निरनिराळ्या प्रतिक्रीया दिल्या आहेत. अनेक युजर्सने म्हटले आहे की दक्षिण कोरियात प्रत्येक ठिकाणी बसवलेले सीसीटीव्ही कॅमेरे देखील लोकांना गुन्हा करण्यापासून रोखतात. तर काही लोकांनी म्हटलेय की अमेरिकेच्या काही छोट्या शहरात देखील लोक न घाबरता बिनधास्त साहित्य उघड्यावर ठेवून जातात.

एक युजर जो गेल्या १० वर्षांपासून द.कोरियात रहात आहे. त्यांनी लिहिलंय की तेथे सर्व काही परफेक्ट नाही. वर्क -लाईफ बॅलन्स आणि एअर क्वालिटीसारख्या समस्या देखील आहेत. मात्र, रात्री बाहेर फिरणे, दरवाजा लॉक करणे वा लॅपटॉप टेबलवर सोडल्यास कोणतेही टेन्शन नाही. हीच गोष्ट तेथे राहण्यास खास बनवते.

आता ही पोस्ट सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत. लोक यावर चर्चा करत आहेत की अखेर कोणा अन्य समाजात एका विश्वास ठेवता येऊ शकतो का ? जेथे लोक त्यांचे साहित्य विना टाळ्याचे सोडून बिनधास्त सोडून देतात.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • ‘महाभारत’मधील कुंतीने दीड वर्षे सर्वांपासून गुप्त ठेवलं लग्न, आता थेट शेअर केले नवऱ्यासोबतचे रोमँटिक फोटो
  • त्यांना ताकदवान लोक नको, गुलाम लोकं पाहिजेत, बंडखोर संजय दिना पाटील यांचा पलटवार
  • आता राज्यात महायुतीमध्ये शिवसेना शिंदे गट सर्वात मोठा पक्ष, जाणून घ्या कोणत्या पक्षाकडे किती खासदार?
  • Bigg Boss : बिग बॉसमध्ये सिगरेट, दारू, बाथरुममध्ये सेक्स अन्…, पडद्यामागचं विचित्र सत्य, अभिनेत्रीकडून शोची पोलखोल
  • India-Pakistan : UN मध्ये भारताला घेरायला गेलेला पाकिस्तान तोंडावर आपटला, भारताचा एकच प्रश्न मुनीर-शरीफची बोलती बंद

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in