• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

भोर तालुक्यातील भाटघर धरणाची पाणी पातळी घटली, प्राचीन पांडवकालीन मंदिर पाण्याबाहेर

May 28, 2026 by admin Leave a Comment


पुण्याच्या भोर तालुक्यातील भाटघर धरणामध्ये 7 टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा राहिला आहे. धरणाची पातळी वेगाने खाली गेल्यामुळे, वर्षभर पाण्यात लुप्त असणारे ऐतिहासिक 'कांबरेश्वर मंदिर' गेल्या आठ दिवसांपासून पाण्याबाहेर येऊ लागले आहे. वेळवंडी नदीवरील हे प्राचीन शिवमंदिर पाहण्यासाठी आणि दर्शनासाठी भाविक तसेच इतिहासप्रेमींची मोठी गर्दी होत आहे.

सन १९२८ मध्ये इंग्रज सरकारने लॉइड डॅम (भाटघर धरण) झाले मात्र हे मंदिर धरणाच्या पाण्यात गेले. दरवर्षी मे महिन्याच्या अखेरीस धरणातील पाणी कमी झाले की हे मंदिर पाण्याबाहेर येते. या मंदिराचे मूळ नाव 'कर्महरेश्वर' असल्याचे सांगितले जाते परंतु कांबरे गावाच्या हद्दीत असल्याने ते 'कांबरेश्वर' म्हणून ओळखले जाते. त्यामुळेच वास्तू विशारद अभियंते इतिहासप्रेमी आणि छायाचित्रकार या ठिकाणाला आवर्जून भेट देतात. दरवर्षी स्थानिक ग्रामस्थ मंदिरातील गाळ काढून स्वच्छता करतात अशी माहिती स्थानिकांनी दिली.

सन १९२८ मध्ये इंग्रज सरकारने लॉइड डॅम (भाटघर धरण) झाले, मात्र हे मंदिर धरणाच्या पाण्यात गेले. दरवर्षी मे महिन्याच्या अखेरीस धरणातील पाणी कमी झाले की हे मंदिर पाण्याबाहेर येते. या मंदिराचे मूळ नाव 'कर्महरेश्वर' असल्याचे सांगितले जाते, परंतु कांबरे गावाच्या हद्दीत असल्याने ते 'कांबरेश्वर' म्हणून ओळखले जाते. त्यामुळेच वास्तू विशारद, अभियंते, इतिहासप्रेमी आणि छायाचित्रकार या ठिकाणाला आवर्जून भेट देतात. दरवर्षी स्थानिक ग्रामस्थ मंदिरातील गाळ काढून स्वच्छता करतात, अशी माहिती स्थानिकांनी दिली.

पाण्यातही वास्तुकला भक्कम मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात नेहमी गुडघाभर पाणी असते. भाविक पाण्यात हात घालून स्वयंभू शिवलिंगाला स्पर्श करतात. मंदिरात पार्वती माता आणि नंदीची मूर्ती आहे. मंदिराच्या भिंतींचे बांधकाम आयताकृती दगडांचे असून कळसाचे बांधकाम चुनखडक वाळू आणि विटांमध्ये आहे. दरवर्षी येणाऱ्या गाळामुळे मंदिराच्या समोरील पाच पायऱ्या जमिनीखाली गाडल्या गेल्या आहेत.

पाण्यातही वास्तुकला भक्कम मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात नेहमी गुडघाभर पाणी असते. भाविक पाण्यात हात घालून स्वयंभू शिवलिंगाला स्पर्श करतात. मंदिरात पार्वती माता आणि नंदीची मूर्ती आहे. मंदिराच्या भिंतींचे बांधकाम आयताकृती दगडांचे असून, कळसाचे बांधकाम चुनखडक, वाळू आणि विटांमध्ये आहे. दरवर्षी येणाऱ्या गाळामुळे मंदिराच्या समोरील पाच पायऱ्या जमिनीखाली गाडल्या गेल्या आहेत.

मंदिराच्या समोर प्राचीन शिळा आणि वीरगळ पाहावयास मिळतात. पाण्याचे असंख्य तडाखे खाऊनही हे मंदिर आजही भक्कम उभे आहे.

मंदिराच्या समोर प्राचीन शिळा आणि वीरगळ पाहावयास मिळतात. पाण्याचे असंख्य तडाखे खाऊनही हे मंदिर आजही भक्कम उभे आहे.

पांडवकाळात या मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले असून रचना मात्र हेनाडपंती असल्याने हे पांडवकालीन मंदिर नसून हेमाडपंती आहे असं स्थानिकांच म्हणणे आहे..

पांडवकाळात या मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले असून रचना मात्र हेनाडपंती असल्याने हे पांडवकालीन मंदिर नसून हेमाडपंती आहे असं स्थानिकांच म्हणणे आहे..



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • शरद पवारांना पुन्हा मोठा हादरा? 3 दिवस नॉट रिचेबल असणारा माजी मंत्री भाजपच्या वाटेवर? राष्ट्रवादीत खळबळ
  • Ketan Agarwal Murder : एफआयरमध्ये आरोपच नाही, वकिलाचा सर्वात मोठा दावा; केतन अग्रवाल प्रकरणात मोठा ट्विस्ट
  • ‘त्या’ दिवशी सियाच्या प्रियकराचे इंटरनेट बंद… दिवसभर काय घडलं? केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणात मोठा खुलासा
  • समृद्धीवर फॉर्च्युनरची ट्रकला धडक, मुंबई-गोवा मार्गावर थारचा चक्काचूर, चार विविध अपघातात एकूण पाच ठार
  • Rain Update : 24, 25, 26, 27, 28 जून रोजी तुफान पाऊस, थेट अतिवृष्टीने धरणं भरणार, पंजाबराव डख यांचा नवा हवामान अंदाज समोर!

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in