• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

भीषण अपघाताचा थरार! ट्रक-पिकअपच्या धडकेत ७ जणांचा जागीच मृत्यू, एकाची प्रकृती नाजूक

June 26, 2026 by admin Leave a Comment


झारखंडच्या रामगड जिल्ह्यातील रजप्पा पोलीस स्टेशनच्या हद्दीत भीषण अपघाताची घटना घडली आहे. ट्रक आणि पिकअपच्या धडकेत ७ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एकाची प्रकृती नाजूक असल्याची माहिती समोर येत आहे. रामगढ-बोकारो रस्त्यावर रात्री १२ वाजता ट्रक आणि पिकअप वाहनाची धडक झाली. यात पिकअप वाहनातून प्रवास करणाऱ्या ‘बेन्जो पार्टी’चे सदस्य गंभीर जखमी झाले. अपघातात मृत पावलेल्यांचे मृतदेह तातडीने रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. तर जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत .

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामगड-बोकारो रस्त्यावर मध्यरात्री दोन वाहनांची धडक झाली. एका वाहनात बसलेल्या ‘बेन्जो पार्टी’चे सदस्य गंभीर जखमी झाले. अपघात मरण पावलेले व्यक्ती हे मारंगमार्चा गावातील रहिवासी होते.

प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही वाहनाची एकमेकांना जोरदार धडक बसली. या अपघातात दोन्ही वाहनांचा चक्काचूर झाला. रामगडमधील रुग्णालयाचे डॉक्टर डॉ. अनिल कुमार यांनी सांगितलं की, ‘अपघातानंतर ८ जणांना रुग्णालयात आणलं गेलं. त्यातील ७ जणांचा मृत्यू झाला होता. तर एकाची प्रकृती गंभीर होती. अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीला प्राथमिक उपचार करून रांची येथील रुग्णालयात हलविण्यात आलं आहे. तर मृत व्यक्तींचे मृतदेह पोस्टमार्टमसाठी ठेवण्यात आले आहेत.

https://x.com/PTI_News/status/2070340896999317757?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E2070340896999317757%7Ctwgr%5Eb6411b32683c4790f0f6a2cc4704ef2dedf112a4%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.indiatv.in%2Fjharkhand%2Fmany-people-died-after-collision-between-vehicle-and-truck-in-ramgarh-2026-06-26-1227424

रामगडचे पोलीस अधिकारी आलोक रंजन यांनी सांगितलं की, प्राथमिक माहितीनुसार, ट्रक चुकीच्या मार्गात घुसला. त्यानंतर या ट्रकने प्रवाशांनी भरलेल्या पिकअपला धडक दिली. पोलिसांनी या अपघातप्रकरणी तपास सुरू करण्यात आला आहे. पोलिसांकडून अपघातामागील कारण शोधण्याचं काम सुरू आहे.

तत्पूर्वी, स्थानिकांच्या आरोपांनुसार, चार दिवसांपूर्वी अपघाताची मोठी दुर्घटना घडली होती. दोन अपघातात मिळून १० जणांचा मृत्यू झाला आहे. रस्त्यावर कोणत्याही प्रकारची चेतावणी देणारी फलके आणि चिन्हे लावण्यात आलेली नाहीत. तसेच अपघात रोखण्यासाठी कोणतीही प्रभावी उपाययोजना करण्यात आली नसल्याचा स्थानिकांचा आरोप आहे. सलग दोन भीषण अपघात घडल्याने रस्ते वाहतुकीच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • पठानों से कहना, चौहान आ रहा है..; अजय देवगण करणार ‘धुरंधर’चा खेळ खल्लास?
  • ANC सपोर्ट आणि 54 तासांपर्यंतच्या बॅटरी लाईफ असलेला वनप्लसचा ‘हा’ नवीन इअरबड्स भारतात लाँच
  • घटस्फोटानंतर ईशा देओलच्या आयुष्यातून रोमान्सच हरवला; म्हणाली “चुका होतात पण..”
  • तुम्हाला काय वाटतं वर दोन गुजराती बसले म्हणून काही करू शकता? आमच्या नादाला… राज ठाकरेंचा जैन समाजाच्या शिष्टमंडळाला इशारा
  • Inflation: अमेरिकेत महागाई पण झळ बसतेय भारताला; सोनं-चांदी, शेअर मार्केट सगळ्यांवर होणार परिणाम, मध्यमवर्गीयांचे हाल होणार

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in