• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

एका मुलीच्या बापासोबत लग्न केल्याचा अभिनेत्रीला पश्चाताप, घटस्फोटानंतर अखेर थेट म्हणाली, ‘दुःख कमी करण्याऐवजी…’

April 24, 2026 by admin Leave a Comment


बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांना दुसऱ्या बायकोचा लेबल मिळाला. दुसरी पत्नी म्हणून अनेक अभिनेत्रींचा संसार सुखी आणि आनंदी ठरला, पण काही अभिनेत्रींवर मात्र पश्चाताप करण्याची वेळ आली. असंच काही एका प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्रीसोबत देखील झालं आहे. सध्या ज्या अभिनेत्रीच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे, ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नाही तर, अभिनेत्री कल्कि कोचलिन आहे. कल्कि हिने अनेक हीट सिनेमांमध्ये काम केलं. बॉलिवूडमध्ये अभिनेत्री यशाच्या शिखरावर चढली, पण खासगी आयुष्यात मात्र अभिनेत्रीने अनेक उतार – चढाव पाहिले…

कल्की हिने वयाच्या 28 व्या वर्षी दिग्दर्शक अनुराग कश्यप याच्यासोबत लग्न केलं. पण त्यांचं लग्न फार काळ टिकलं नाही. अखेर त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. घटस्फोटानंतर अभिनेत्री वाईट दिवसांचा सामना केला. याबद्दल स्वतः कल्की हिने मोठा खुलासा केला आहे. ‘दुःख कमी करण्यापेक्षा ते अनुभवलेलं कधीही चांगलं असतं…’ असं अभिनेत्री म्हणाली.

नुकताच झालेल्या एका मुलाखतीत अभिनेत्री म्हणाली, ‘फक्त थेरेपीने काहीही होत नाही जेव्हा तुम्ही आयुष्यातील वाईट काळातून जात असता, तेव्हा कधी – कधी थेरेपी घेणं देखील कठीण होतं. तेव्हा तुम्हाला दुःख अनुभवनं फार महत्त्वाचं असतं. अशा काळात प्रामाणिकपणा फार महत्त्वाचा असतो… मला असं वाटतं की, दुःख कमी करण्यापेक्षा ते अनुभवलेलं कधीही चांगलं असतं…’

पुढे अभिनेत्री म्हणाली, ‘अशी नाती मोडल्यानंतर त्या व्यक्तीपासून लांब राहणं गरजेचं आहे. कारण यामुळे राग आणि वेदना हळू हळू कमी होतात. पुढे काय करायचं याबद्दल कळू लागलं आणि मार्ग मोकळा होतो… या काळात आठवणींसोबत आयुष्य जगावं लागतं… घटस्फोटानंतरचा काळ हा फार वाईट काळ असतो… कारण तुम्ही त्या नात्यातून बाहेर येता… जेथे एकत्र राहणं शक्यच नसतं… माझ्यासोबत देखील असं झालं आहे…. आम्ही एकमेकांपासून लांब राहिलो, ज्यामुळे आता चांगल्या प्रकारे आम्ही कधी कधी एकमेकांना भेटतो…’

सांगायचं झालं तर, कल्की आणि अनुराग यांची पहिली भेट ‘देव डी’ सिनेमाच्या सेटवर झालेली. कालांतराने भेटीच प्रेमात रुपांतर झालं आणि 2011 मध्ये दोघांनी लग्न केलं. पण त्यांचं लग्न 2 वर्ष देखील टिकलं नाही. 2015 मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला… अनुराग याचं पहिलं लग्न आरती बजाज हिच्यासोबत झालेलं. त्यांना एक मुलगी देखील आहे.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • RR vs SRH : राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद दुसऱ्यांदा भिडणार, आतापर्यंत कशी आहे आकडेवारी
  • इराणचा आतापर्यंतचा सर्वात मोठा डाव, संपूर्ण जगाचं इंटरनेट ठप्प होणार? भारतालाही जबर धक्का!
  • जिओचा 448 रुपयांचा भन्नाट प्लान, तीन महिन्यांची वैधता आणि फायदेही चिक्कार
  • DC vs PBKS : दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्स आमनेसामने, श्रेयस की अक्षर कोण ठरणार वरचढ?
  • महाराष्ट्रातील BAPS स्वामीनारायण मंदिराची प्राणप्रतिष्ठा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या शुभेच्छा

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in