• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Vastu Shastra : कुटुंबात सतत भांडणं होतायेत? एक मिनीट पण मनाला शांतता नाहीये? मग आजच करा हे सोपे उपाय

March 6, 2026 by admin Leave a Comment


अनेकदा असं होतं की घरात काहीही कारण नसताना सतत भांडणं सुरू असतात. पती-पत्नीचं एकही मिनिट पटत नाही. कुटुंब प्रमुखाचे कोणत्या नं कोणत्या कारणामुळे सतत घरातील सदस्यांसोबत वाद होतात. घरात शांती टिकत नाही, यासाठी अनेक कारणं असू शकतात. परंतु जेव्हा तुमच्या घरात वास्तुदोष निर्माण होतो, तेव्हा देखील अशी परिस्थिती निर्माण होते. जर घर अशांत असेल, पती-पत्नीचं पटत नसेल तर त्याचा परिणाम हा त्या घरातील लहान मुलांच्या मनावर देखील होतो. ते देखील चिडचिड करतात. त्यामुळे अशी परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी वास्तुशास्त्रानुसार काही गोष्टींची काळजी घेणे अत्यावश्यक असतं. वास्तुशास्त्रानुसार तुमच्या घरात जेवढ्या काही वस्तू असतात, त्या प्रत्येक वस्तूंचा तुमच्या आयुष्यावर सकारात्मक किंवा नकरात्मक असा परिणाम होत असतो. तसेच वास्तुशास्त्रामध्ये दिशेला देखील खूप महत्त्व आहे. वास्तुशास्त्रानुसार घरातील प्रत्येक वस्तू ही योग्य दिशेलाच ठेवली गेली पाहिजे. चला तर मग जाणून घेऊयात वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलेले उपाय.

देवघर – वास्तुशास्त्रानुसार तुमचं देवघर हे नेहमी ईशान्य कोपऱ्यातच असावं. तसेच त्याची रचना ही तुम्ही जेव्हा पुजेसाठी बसता तेव्हा तुमचं तोंड हे पूर्वेला किंवा पश्चिमेला होईल अशी हवी. तसेच देवघराची नियमित स्वच्छता करावी, दररोज आठवणीने देवघरात दिवा लावावा. यामुळे वास्तुदोष दूर होतो, नकारात्मक शक्ती नष्ट होते, सकारात्मक शक्तींमुळे घरातील वाद विवाद टळतात, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे.

पूर्वजांचे फोटो – आपल्या पूर्वजांचे फोटो कधीही देवघरात ठेवण्याची चूक करू नका, कारण तुमच्या घरातील देवघर हे सकारात्मक शक्तींचा सर्वात मोठा स्त्रोत असतो. अशा स्थितीमध्ये तुम्ही जर तुमच्या पूर्वजांचे फोटो देवघरात जर ठेवले तर त्याचा तुमच्या आयुष्यावर भयंकर नकारात्मक परिणाम होतो, त्यामुळे कधीही आपल्या पूर्वजांचे फोटो हे देवघरात ठेवू नये, तर ते नेहमी आपल्या घराच्या दक्षिण दिशेच्या भिंतीला लावावेत. जर तुम्ही पूर्वजांचे फोटो देवघरात ठेवले तर त्यामुळे घरात भांडणं होऊ शकतात, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे.

काळा रंग – घराची सजावट करताना कधीही काळ्या रंगाचा वापर करू नका, कारण काळा रंग हा नकारात्मकतेचं प्रतिक माण्यात येतो. त्यामुळे घरात कधीही सजावटीसाठी काळ्या रंगाचा वापर करू नये, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे.

रंग संगती – घराची सजावट करताना नेहमी हलक्या व सौम्य कलरचा वापर करावा, जसं की पांढरा, सौम्य निळा, हिरवा असे रंग वापरावेत, भडक रंगांचा वापर करू नये. या उपायामुळे घरात सकारात्मक ऊर्जा टिकून राहते, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

 



Source link

Filed Under: lifestyle

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • आम्ही मुंबई पोलीस… तुमचं दहशतवाद्यांशी कनेक्शन… एक कॉल आला आणि… कल्याणमध्ये त्या घटनेने सर्वच हादरले
  • PM Kisan Yojana: पीएम किसानचा 23 वा हप्ता अडकणार? महाराष्ट्रासह 14 राज्यातील शेतकऱ्यांनो, झटपट करा हे काम
  • Supriya Sule | अजित पवार यांचा फोन सापडला ब्लॅक बॉक्स का नाही सापडणार? सुप्रिया सुळेंचा तपास यंत्रणांवर संताप
  • वरुथिनी एकादशीला पडणार पंचकांची सावली, जाणून घ्या कोणत्या कर्मांनी मिळेल पुण्य
  • US Iran Peace Talks In Islamabad : इराण जिवंत आहे फक्त… ट्रम्प यांची पुन्हा धमकी; शांतीवार्ते आधीच दिलं टेन्शन; आता…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in