
Virat Kohli on Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशी…आता नावच बस्स झालं. मैदानाचा कानकोपरा आणि सीमा सुद्धा आता सूर्यवंशीने वैभवशाली करून सोडल्या आहेत. त्याने काल रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) विरोधात तुफान खेळी खेळली. त्या एका षटकाने तर आरसीबीची झोप उडवली. या षटकात वैभव सूर्यवंशीने विराट कामगिरी केल्यानंतर कोहलीही दंग झाला. तो त्याच्याकडे आणि त्याच्या बॅटकडे पाहत राहिला. आरसीबीचा या सामन्यात पराभव झाला. त्यानंतर कोहलीने सूर्यवंशीची भेट घेतली. त्याला एक खास गिफ्ट दिले.
ऑरेंज कॅपचा मानकरी
राजस्थान रॉयल्सचा 15 वर्षांचा सलामीवीर वैभव सूर्यवंशी आता ऑरेंज कॅपचा मानकरी ठरला आहे. त्याने शुक्रवारी गुवाहाटी येथील बारसापारा स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB)विरोधात 78 धावांची तुफान खेळी खेळली. या खेळी दरम्यान त्याची आक्रमक शैली दिसली. त्याने तुफान खेळी केली. राजस्थानचा संघ 202 धावांचा पाठलाग करण्यास उतरल्यावर वैभवने मैदान दणाणून सोडले. त्याची खेळी पाहून अनेकांच्या डोळ्यांचे पारणे फिटले.
सूर्यवंशीला कोहलीचे खास गिफ्ट
भुवनेश्वर कुमार आणि जोश हेजलवूडविरोधात सूर्यवंशीने कोणतीच दयामाया दाखवली नाही. आला चेंडू की तो मैदानाबाहेर टोलवण्याचा सपाटाच त्याने लावला. त्यामुळे दिग्गज गोलंदाज घामाघूम झाले. हे गोलंदाजच एकावेळी दबावाखाली आल्याचे दिसले. पॉवरप्ले दरम्यान सूर्यवंशीने त्याने गोलंदाजांची दाणादाण उडवली. कोहलीने सुद्धा त्याच्या या खेळीची स्तुती केली. सामना संपल्यानंतर सूर्यवंशीने विराट कोहलीची स्वाक्षरी घेतली. कोहलीने सूर्यवंशीच्या राजस्थान रॉयल्सच्या कॅपवर ऑटोग्राफ दिला. RCB विरोधात त्याच्या खेळीचे कोहलीने कौतुक केले. त्याने स्वाक्षरी करताना एक संदेश ही दिला. त्याने त्या टोपीवर, ‘डिअर वैभव, खूप छान’ असे लिहिले. या कौतुकाने वैभवला आकाश ठेंगणे झाले.
Player of the Match
Orange Cap
An autograph from KohliGood night to everyone and remember to keep believing in yourself no matter what
pic.twitter.com/Up2BZuYObM
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) April 10, 2026
डिअर वैभव, खूप जबरदस्त
कोहलीचा ऑटोग्राफ आणि त्याचा संदेश सूर्यवंशीसाठी बहुमोल ठरला. एकावेळी 202 धावांचा डोंगर पार करणे राजस्थान रॉयल्ससाठी अशक्य वाटत होते. पण सूर्यवंशीच्या स्फोटक खेळीने RCB ची लय पूर्णपणे बिघडवून टाकली. पण रियान पराग या कर्णधाराच्या मार्गदर्शनाखाली संघाने 12 चेंडू उरलेले असताना 6 गाडी राखत दमदार विजय मिळवला.


Leave a Reply