• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Trade Deal : भारत-अमेरिका ट्रेड डीलमुळे शेतकऱ्यांच्या हिताला खरचं धोका आहे का? पीयूष गोयल राहुल गांधींच्या आरोपांवर काय म्हणाले?

February 14, 2026 by admin Leave a Comment


भारत आणि अमेरिकेत झालेल्या ट्रेड डीलवरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शाब्दीक द्वंद सुरु आहे. यावरुन पुन्हा एकदा केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी लोकसभेत विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. काँग्रेस नेते राहुल गांधी विचारपूर्वक, बनावटी आणि खोटी कहाणी रचून शेतकऱ्यांची दिशाभूल करतायत असा आरोप पीयूष गोयल यांनी केला. शेतकरी सुरक्षित असेल, तर देशाचा विकास होईल असं सुद्धा गोयल म्हणाले. “राहुल गांधी हे काही काँग्रेस कार्यकर्त्यांच्या खांद्यावर बसले आहेत, जे स्वत:ला शेतकरी नेते भासवतात. ते पूर्णपणे आधारहीन आणि चुकीचं बोलत आहेत. तुम्ही त्यांना मायक्रोफोन घेऊन फिरताना, चर्चा रेकॉर्ड करताना पाहू शकता. याची स्क्रिप्ट आधीपासूनच तयार असावी. कारण त्यांनी जे काही दावे केलेत ते खोटे आहेत” असा आरोप केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी केला.

“भारत-अमेरिका ट्रेड डीलमध्ये मोदी सरकारने शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य दिलं. शेतकऱ्यांचं हित पूर्णपणे सुरक्षित ठेवण्यात आलय” असं ठामपणे पीयूष गोयल यांनी सांगितलं. “या ट्रेड डीलमुळे शेतकरी, मच्छीमार, मेहनती युवावर्ग, MSMEs, स्टार्टअप्स, कारागिर यांना मदत होणार आहे. सोयाबीन आणि मक्यावर कुठलीही सवलत दिलेली नाही. राहुल गांधी हे खोटं बोलून शेतकऱ्यांना घाबरवण्याचा प्रयत्न करतायत” असं पीयूष गोयल म्हणाले.

सफरचंद, अक्रोड आयातीवर काय म्हणाले?

गावच्या लोकांमध्ये विनाकारण भिती निर्माण करण्यासाठी तथ्यहीन आरोप होत असल्याबद्दल विरोधा पक्षावर टीका केली. सफरचंद आयातीच्या निर्णयावरुन सुरु असलेल्या वादावर पीयूष गोयल बोलले की, “भारत आधीपासूनच दरवर्षी 5.50 लाख टन सफरचंदांची आयात करत आला आहे. कारण देशांतर्गत उत्पादनातून 80 टक्के मागणी पूर्ण होते. आम्ही सफरचंदांच्या अमर्यादा आयातीला परवानगी दिलेली नाही. आम्ही फक्त एक कोटा दिलाय, जो सध्याच्या आयातीपेक्षा पण कमी आहे. त्यावर सुद्धा 25 रुपयाची ड्युटी लागेल”

“अक्रोड आयतीच्या बाबतीत सुद्धा असच आहे. भारत वर्षाला 60 हजार मेट्रिक टन अक्रोड आयात करतो. त्यातला 13,000 मेट्रिक टनचा फार कमी कोटा दिलाय. अशा सौद्यामुळे स्थानिक उत्पादकांचं नुकसान होण्याची शक्यता कमी आहे” असं गोयल म्हणाले.

जुन्या रेकॉर्डवर हल्लाबोल

काँग्रेसवर निशाणा साधताना पीयूष गोयल यांनी त्यांच्या जुन्या रेकॉर्डवर हल्लाबोल केला. “काँग्रेसच्या नेतृत्वाखाली UPA राजवटीत भारताने जवळपास 20 अब्ज डॉलर्सचं शेती सामान आयात केलं होतं. यात डेअरी उत्पादनं सुद्धा होती” याची आठवण गोयल यांनी करुन दिली. US सोबतच्या ट्रेड डीलमध्ये भारताने डेअरी उत्पादनांना बाहेर ठेवलं आहे. “शेतकऱ्यांसोबत त्यांनी धोका केला, त्या बद्दल राहुल गांधी यांनी बोलावं. विरोधी पक्ष कधीपर्यंत अशा कपोलकल्पित गोष्टी पसवरणार? शेतकरी सुरक्षित तर देश विकसित होईल” असही गोयल बोलले.

 



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • दिल्लीतले लोक माझी चेष्टा करायला लागले… भोंदू बाबा खरात प्रकरणावर सुप्रिया सुळे संतापल्या
  • Supriya Sule | खरात प्रकरणामुळे देशात महाराष्ट्राची चेष्टा झालीये – सुप्रिया सुळेंचा तीव्र संताप
  • वयाच्या 18 व्या वर्षी अभिनेत्रीने खरेदी केली कोट्यावधींची मर्सिडीज कार, सौंदर्यामध्ये देते बॉलिवूड अभिनेत्रींना टक्कर
  • बायकोचं अबॉर्शन, तीन मृतदेह, ‘तो’ फार्महाउस आणि… अजहरुद्दीनचं भयानक कांड… एका अल्पवयीन मुलीला तर…
  • माझ्याकडे एक चिठ्ठी आली, त्यावर नारायण राणेंची सही आणि लिहिलं होतं… देवेंद्र फडणवीस यांनी तो किस्सा

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in