
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल 2026-27 साठी अर्थसंकल्प सादर केला. लाडकी बहीण योजना सुरूच राहणार, शेतकऱ्यांना दोन लाखांपर्यंत कर्जमाफी यासाह अनेक महत्वाचे निर्णय जाहीर करत मुख्यमंत्र्यांनी राज्यासाठी विविध घोषणाही केल्या. सत्ताधाऱ्यांनी त्यांच्या अर्थसंकल्पाचे कौतुक केलं असलं तरी विरोधक मात्र या अर्थसंकल्पावर फार खुश नाहीत. शिवसेना ठाकरे गटाचे नते, खासदार संजय राऊत यांनीही या यअर्थसंकल्पावरून टिपण्णी केली आहे.
ठेकेदारांच हित लक्षात घेऊन हा अर्थसंकल्प मांडलेला दिसतोय, अशा शब्दांत राऊतांनी टीकास्त्र सोडलं.
काय म्हणाले राऊत ?
शेतकऱ्यांना खरोखर कर्जमाफी मिळणार असेल तर त्याचं स्वागतच केलं पाहिजे. राज्याचा शेतकरी संकटात आहे. विशेषत: आखाती युद्धामुळे, इराणच्या युद्धामुळे इथून जी निर्यात होते ती दुबईच्या पोर्टवर, अन्य पोर्टवर 8 दिवसांपासून तशीच पडून आहे. माल सडतोय, शेतकऱ्यांचे नुकसान होतंय. अशा शेतकऱ्यांना कर्ज काढावं लागतं, अवकाळी पाऊस, गारपीट यामुळे शेतकरी मेटाकुटीस आलाय. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते तेव्हा पहिल्या कॅबिनेटमध्ये त्यांनी कर्जमाफीची घोषणा केली होती. त्यानंतर उद्धव ठाकरे यांचं सरकार संपूर्ण कर्जमाफीच्या दिशेने जात असताना, ते सरकार पाडण्यात आलं. त्यामुळे आता ही जबाबदारी नव्या सराकरची आहे. खरोखर कर्जमाफी होणारा का हे पहावं लागेल. असं राऊत म्हणाले.
ठेकेदारांसाठी निर्माण झालेला अर्थसंकल्प
या अर्थसंकल्पाचं उत्तम विश्लेषण आदित्य ठाकरे यांनी केलं. हा ठेकेदारांसाठी निर्माण झालेला अर्थसंकल्प आहे, असं ते म्हणाले होते. ज्या प्रकारचे इन्फ्रास्ट्रक्चर, योजना दिसत आहेत, हे ठेकेदारांचं हित लक्षात घेऊ अर्थसंकल्प तयार केलाय हे स्पष्ट दिसतंय असंही राऊत यांनी नमूद केलं.
Leave a Reply