
अभिनेता सलमान खानने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एका कार्यक्रमात हजेरी लावल्याने महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे. संघाच्या या कार्यक्रमाला भाजपचे मंत्री नितेश राणे देखील उपस्थित होते. सलमान खानच्या उपस्थितीवरून विरोधकांनी संघासह भाजपच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. भाजपने विरोधकांवर टीका करण्यासाठी आपला वापर केला आणि नंतर अपमानित केल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.
भाजपने आपल्या व्यासपीठावर सलमान खानला सन्मानाने जागा दिली, तर आपल्याच मंत्र्यांना तिसऱ्या रांगेत बसवले, असे विरोधकांचे म्हणणे आहे. यावर भाजपने स्पष्ट केले आहे की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमात प्रत्येक देशभक्त नागरिकाचे स्वागत केले जाते. सलमान खान हा या देशाचा नागरिक असल्याने त्याचेही स्वागत करण्यात आले. हा मुद्दा सध्या सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार चर्चेचा विषय बनला आहे.
Leave a Reply