
वैभव सूर्यवंशी याने केलेल्या वादळी खेळीच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील 16 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्सचा 6 विकेट्सने धुव्वा उडवला आहे. आरसीबीने राजस्थानसमोर 202 धावांचं आव्हान ठेवलं होतं. राजस्थानने हे आव्हान 13 बॉलआधी आणि 6 विकेट्स राखून पूर्ण केलं. राजस्थानने 17.5 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून हे आव्हान पूर्ण केलं. राजस्थान यासह सलग आणि एकूण चौथा विजय मिळवला आहे. राजस्थान 19 व्या मोसमात सलग 4 सामने जिंकणारी पहिली टीम ठरली.
Leave a Reply