• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

RR vs MI Rain : राजस्थान विरूद्धच्या टॉसला विलंब, सलग दुसरा सामना पावसामुळे रद्द होणार?

April 8, 2026 by admin Leave a Comment

आयपीएलच्या 19 व्या मोसमातील (IPL 2026) 12 वा सामना पावसामुळे रद्द करावा लागला. कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध पंजाब किंग्स यांच्यात 6 एप्रिलला झालेल्या सामन्यात 3.5 ओव्हरचा खेळ झाला. केकेआरने 22 बॉलमध्ये 2 विकेट्स गमावून 25 धावा केल्या. मात्र त्यानंतर आलेल्या पावसामुळे खेळ थांबवावा लागला. पावसामुळे सव्वा 3 तासांचा खेळ वाया गेला. त्यानंतरही चाहत्यांना सामना सुरु होईल अशी आशा होती. मात्र अखेर खेळपट्टीची परिस्थिती पाहून पंचांनी दोन्ही संघांच्या कर्णधारांच्या सहमतीने सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आता सलग दुसरा सामनाही पावसामुळे रद्द होतो की काय? अशी स्थिती पाहायला मिळत आहे.

स्पर्धेतील 19 व्या मोसमातील 13 व्या सामन्यात राजस्थान रॉयल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स आमनेसामने आहेत. सामना गुवाहाटीतील बारसपारा क्रिकेट स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आला आहे. चाहत्यांचं सामन्याआधी टॉस कोण जिंकतो? याकडे लक्ष होतं. मात्र पावसामुळे टॉसला विलंब झाला आहे. संध्याकाळी 7 वाजता टॉस होतो. मात्र पावसाच्या जोरदार बॅटिंगमुळे टॉसला विलंब झाला आहे. पावसामुळे30 मिनिटं वाया गेली आहेत. त्यामुळे आता चाहत्यांना पावसाच्या विश्रांतीची वाट पाहावी लागणार आहे.

ग्राउंड स्टाफकडून जोरदार प्रयत्न

बारसापारा क्रिकेट स्टेडियममध्ये सुरु असलेल्या पावसामुळे मैदानात पाणी जमा झालं आहे. त्यामुळे हे पाणी लवकरात लवकर हटवण्याचं आव्हान ग्राउंड स्टाफसमोर आहे. ग्राउंड स्टाफकडून युद्ध पातळीवर मैदान कोरडं करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र पावसाची संततधार सुरु असल्याने ग्राउंड स्टाफच्या कामात अडथळा येत आहे. त्यामुळे पाऊस थांबावा अशी प्रार्थना क्रिकेट चाहत्यांकडून करण्यात येत आहे.

गुवाहाटीत पावसाची बॅटिंग

🚨 Update 🚨

Toss is delayed in Guwahati.

Next update to follow once the rain stops.#TATAIPL | #KhelBindaas | #RRvMI pic.twitter.com/cheEGdXSEz

— IndianPremierLeague (@IPL) April 7, 2026

क्रिकेट चाहत्यांचा संताप

पावसाच्या व्यत्ययामुळे क्रिकेट चाहत्यांनी संताप व्यक्त केला आहे. नको तिथे सामने ठेवल्यावर आणखी काय होणार? असा संतप्त सवाल क्रिकेट चाहत्यांकडून उपस्थित केला जात आहे. कधी आणि कुठे पाऊस होणार? त्या शहरातील हवामान कसं असणार? हे समजतं. हवामान खात्याकडून वेळोवेळी माहिती देण्यात येते. मात्र त्यानंतरही ज्या ठिकाणी पावसाची शक्यता आहे तिथे सामन्याचं आयोजन का केलं जातं? असा संतप्त सवाल क्रिकेट चाहत्यांकडून या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • आरोग्यासाठी कोणता मशरूम आणि चीज सर्वोत्तम?
  • या देशात २० हजारात चहा आणि १ लाखात लंच, तरीही जगातला सर्वात स्वस्त देश, होते पर्यटकांची मोठी गर्दी
  • RR vs MI Score Updates and Highlights IPL 2026 : राजस्थान रॉयल्सने मुंबई इंडियन्सला 27 धावांनी नमवलं
  • Iran US War Update : जगासाठी सर्वात मोठी गुड न्यूज… अखेर इराण… रातोरात काय घडलं?
  • या 3 चित्रपटांना बॅन करण्याची मागणी, काहींनी तर फ्लॉप होण्यासाठी मागितलेली मन्नत, पण चित्रपट ठरले ब्लॉकबस्टर

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in