
आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील पहिल्या सामन्यात टॉस कोण जिंकणार? याची प्रतिक्षा चाहत्यांना होती. अखेर ही प्रतिक्षा संपली आहे. या हंगामातील सलामीच्या सामन्यात गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद आमनेसामने आहेत. बंगळुरुतील एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये 2008 नंतर पहिल्यांदाच आयपीएलच्या हंगामातील सलामीचा सामना होत आहे. सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. त्याआधी 7 वाजता टॉस झाला. गतविजेत्या आरसीबीच्या बाजूने नाणेफेकाचा कौल लागला आहे. कर्णधार रजत पाटीदार याने चेसिंगचा निर्णय घेत हैदराबादला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे. त्यामुळे आता हैदराबादचे राक्षशी बॅटिंग करणारे फलंदाज किती धावांपर्यंत मजल मारण्यात यशस्वी ठरतात हे थोड्याच वेळात स्पष्ट होईल.
Leave a Reply