
विराट कोहली, फिलिप सॉल्ट आणि कॅप्टन रजत पाटीदार या तिघांचा अर्धशतकी तडाखा आणि टीम डेव्हीड याने दिलेल्या फिनिशिंग टचच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील 20 व्या सामन्यात यजमान मुंबई इंडियन्ससमोर 241 धावांचं महाकाय आव्हान ठेवलं आहे. मुंबईने आतापर्यंत स्पर्धेच्या इतिहासात 221 धावांचा यशस्वी पाठलाग केला आहे. त्यामुळे मुंबईला वानखेडे स्टेडियमध्ये जिंकायचं असेल तर आपल्या इतिहासातील सर्वात मोठ्या धावसंख्येचा यशस्वी पाठलाग करावा लागेल. आता या प्रयत्नात मुंबई इंडियन्स यशस्वी ठरणार की आरसीबी मैदान मारणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
Leave a Reply