• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

PM Modi CCS Meeting : युद्धाच्या पार्श्वभूमीवर पीएम मोदींची हाय लेव्हल बैठक, त्यानंतर पहिल्यांदाच डायरेक्ट घेतली अशी भूमिका

March 4, 2026 by admin Leave a Comment


पंतप्रधान नरेंद्र मोदी राजस्थान, गुजरात, तामिळनाडू आणि पुडुचेरीच्या दोन दिवसीय दौऱ्यानंतर रात्री जवळपास 9.30 वाजता दिल्लीत पोहोचले. त्यांनी UAE च्या राष्ट्रपतींसोबत चर्चा केली. सोशल मीडियावर त्यांनी ही माहिती दिली. सोबतच त्यांनी CCS ची बैठक बोलावली. UAE चे अध्यक्ष आणि माझे बंधु भाई शेख मोहम्मद बिन जायद अल नाहयान यांच्याशी मी चर्चा केली असं मोदींनी सांगितलं. त्यांनी UAE वर झालेल्या हल्ल्याची निंदा केली. जिवीत व वित्तहानी झाली त्यावर दु:ख व्यक्त केलं. भारत या कठीण काळात यूएई सोबत भक्कपणे उभा आहे, असं मोदींनी सांगितलं. ते इस्रायलच्या पंतप्रधानांसोबत सुद्धा बोलले. चालू असलेल्या युद्धात भारताची भूमिका तटस्थतेची आहे. पण पहिल्यांदाच पीएम मोदींनी इराणचा निषेध केला. ही सुद्धा बाब महत्वाची आहे.

पीएम मोदींनी रविवारी रात्री दिल्लीत परतल्यानंतर इराण विरुद्ध इस्रायल-अमेरिका युद्धाच्या पार्श्वभूमीवर कॅबिनेट कमिटी ऑन सिक्योरिटीची (CCS) बैठक बोलावली. अमेरिका-इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानंतर निर्माण झालेल्या जागतिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर माहिती घेण्यासाठी ही बैठक बोलावली होती. या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई मारले गेले. पीएम मोदींनी बैठकीत परिस्थितीचा आढावा घेतला. ही बैठक रात्री उशिरापर्यंत सुरु होती.

बैठकीत काय निर्देश दिले?

आखाती देशांमध्ये झालेल्या हल्ल्यासंदर्भात या बैठकीत माहिती देण्यात आली. आखाती देशांमध्ये मोठ्या संख्येने भारतीय वास्तव्याला आहेत. भारतीय प्रवासी समुदायाच्या सुरक्षेबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली. आखातामधील सुरक्षा स्थिती त्याचसोबत व्यापारी, आर्थिक परिणाम होणार त्यावर विचार करण्यात आला. सीसीएसने सर्व संबंधित विभागांना या घटनांमुळे प्रभावित होणाऱ्या भारतीय नागरिकांच्या मदतीसाठी आवश्यक, व्यवहार्य पावलं उचलण्याचे निर्देश दिले.

आखातामध्ये राहणाऱ्या भारतीयांची संख्या किती?

इराणने होर्मुज स्ट्रेट बंद केल्यामुळे तिथे कशा प्रकारची परिस्थिती आहे, याची माहिती घेण्यात आली. हा स्ट्रेट भारताच्या तेल जहाजांसाठी महत्वाचा रस्ता आहे. इराणमध्ये 10 हजार भारतीय नागरिक राहतात. इस्रायलमध्ये 40 हजार तर खाडी देश आणि पश्चिम आशियात राहणाऱ्या नागरिकांची संख्या जवळपास 90 लाखाच्या घरात आहे. भारताने याआधी युद्धाच्यावेळी पश्चिम आशियासह वेगवेगळ्या देशातून भारतीयांना सुरक्षितरित्या बाहेर काढलं आहे. भारतीय दूतावास आपल्या नागरिकांच्या संपर्कात आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • लग्नाआधी नवरीला बोलावलेलं, अशोक खरातचं आतापर्यंतच सर्वात घाणेरडं सत्य समोर
  • इराणला डोनाल्ड ट्रम्प यांचा अल्टिमेटम, थेट म्हटले, सहमत असो वा नसो आम्ही..
  • एकनाथ शिंदेंचा आतापर्यंतचा सर्वात मोठा डाव, ठाकरेंचे 8 खासदार फोडणार, नावही ठरली, मध्यरात्रीची मोठी घडामोड
  • जेठालाल ते बबिता.. ‘तारक मेहता..’च्या कलाकारांनी जमवली इतकी संपत्ती; कोण सर्वांत श्रीमंत?
  • Pakistan Mediation : हीच पाकिस्तानची औकात, ज्यांच्यात मध्यस्थी घडवणार त्यांच्यातल्या एका देशाला म्हटलं कॅन्सर

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in