
Piyush Goyal on US-India Trade Deal: भारत आणि अमेरिकेतील व्यापारी करारामुळे भारतीय शेतकरी आणि कृषी क्षेत्र धोक्यात आल्याचा दावा विरोधक दोन दिवसांपासून करत होते. देशाचे माजी कृषीमंत्री शरद पवार यांनी जोपर्यंत या कराराची प्रत समोर येऊन स्पष्टता येत नाही तोपर्यंत शेतकर्यांशी संबंधित चिंता व्यक्त केली होती. आता देशाचे वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल यांनी आताच घेतलेल्या पत्रकार परिषदेत या चिंता निरर्थक असल्याचा दावा केला आहे. त्यांच्या मते हा करार दबावाखाली झालेला नाही. या करारामुळे भारतीय शेतकऱ्यांचे आणि कृषी क्षेत्राचं कोणतंही नुकसान होणार नाही. या कराराविषयी त्यांनी संक्षिप्तपणे काही ठळक मुद्दे समोर आणले आहेत.
भारत आणि अमेरिकेत रखडलेला व्यापारी करार अखेर पूर्णत्वास गेला. 13 फेब्रुवारी, 2025 रोजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात द्विपक्षीय व्यापारी करारवर पहिल्यांदा औपचारिक बोलणी झाली होती. पण रशियाकडून इंधन खरेदीच्या मुद्दावर संबंध ताणल्या गेले आणि राजकीय वाद पेटला. काल परवा डोनाल्ड ट्रम्प यांनी समाज माध्यमांवर भारतावरील अतिरिक्त 25 टक्के टॅरिफ हटवल्याचे जाहीर केले. तसेच नियमीत टॅरिफमधील 7 टक्क्यांची कपात केल्याचे जाहीर केले. आता भारतावर 18 टक्के टॅरिफ लावण्यात आले आहे.
बातमी अपडेट होत आहे…
Leave a Reply