• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Mohammed Siraj : एवढं खरं कोण बोलतं ? फायनल मॅचनंतर सिराज जे बोलून गेला.. Video होतोय तूफान व्हायरल

March 9, 2026 by admin Leave a Comment

काल, 8 मार्चचा दिवस हा भारतीय क्रिकेट प्रेमींसाठी अविस्मरणीय होता. आत्तापर्यंत कोणीच केलं नाही, असं काम भारतीय क्रिकेट संघाने करून दाखवलं. काल रात्री, भारतीय संघानेT20 वर्ल्ड कप फायनल जिंकून एक अतुलनीय विक्रम प्रस्थापित केला. भारतीय संघ तीन वेळा T20 वर्ल्ड कप जिंकणारा पहिला संघ बनला आहे. एवढंच नव्हे तर घरच्या मैदानावर T20 वर्ल्ड कप जिंकणारा पहिला संघ आणि सलग दोन T20 वर्ल्ड कप जिंकणारा पहिला संघ बनण्याचा विक्रमही आता भारताच्याच नावे आहे. हे सगळं तर तुम्ह आततापर्यंत वाचलंच असेल, कळंलही असेल. पण आता अशी गोष्ट जाणून घेऊया, जी बऱ्याच जणांना माहीत नसेल. भारताचा खेळाडू,उत्तम गोलंदाज मोहम्मद सिराज याचा एक व्हिडीओ आता व्हायरल झाला असून सर्वत्र त्याचीच चर्चा सुरू आहे, असं काय आहे त्या व्हिडीओत ?

असं काय बोलून गेला मोहम्मद सिराज ?

काल रात्री अंतिम सामना जिंकून T20 वर्ल्ड कपवर नाव कोरल्यानंतर टीम इंडियातील वेगवेगळ्या खेळाडूंच्या मुलाखती घेण्यात आल्या. आता कसं वाटतंय, काय भावान आहेत हे अनेकांना विचारण्यात आलं. याचदरम्यान, भारतीय संघातील गोलंदाज, मोहम्मद सिराजला विचारण्यात आलं की, प्लेइंग 11 मधून बाहेर असल्याने, भारताच्या विजयात त्यानं आणि कुलदीप यादवचं काय योगदान दिलं? हा प्रश्न ऐकून त्याने जे उत्तर दिलं ते खरंच ऐकण्यासारखं होतं. सिाज म्हणाला, ‘हो, आमची (विजयात) भूमिका खूप मोठी आहे कारण आम्हाला बाहेर बसून गोलंदाजांना पाणी पाजावं लागलं.’ बास हा व्हिडीओ इथेच कट करून तो सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आलाय पण एवढीशी क्लिपही खूप व्हायरल झाली आहे. मजेमजेत दिलेलं त्याचं हे उत्तर खूप व्हायरल झालंय.

 

Arre bhai.. Siraj! 😂 pic.twitter.com/VDJTaMFE7z

— Keh Ke Peheno (@coolfunnytshirt) March 9, 2026

नेमकं काय म्हणाला होता सिराज ?

पण तुम्ही आत्ताच जो व्हिडिओ पाहिला, तो तर व्हायरल होत असलेल्या मुलाखतीमधला छोटा भाग, छोटीशी क्लिप आहे. त्यानंतर @StarSportsIndia या अकाउंटवर संपूर्ण व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये मोहम्मद सिराजने या प्रश्नाचं पूर्ण उत्तर काय दिलं ते स्पष्ट दिसलं आहे. ” संघाच्या बाहेर बसणं, ही देखील खूप मोठी भूमिका असते. कारण लोकांना पाणी देणे, नेटमध्ये गोलंदाजी करणे, सकारात्मक संघाचे वातावरण राखणे आणि नेहमी संघाला प्राधान्य देणे. या सर्व गोष्टी संघाच्या यशात महत्त्वपूर्ण योगदान देतात. कोणत्याही वैयक्तिक ध्येयापेक्षा संघाचे ध्येय अधिक महत्त्वाचे असते.” असं त्याने सांगितलं. संघात समावेश व्हावा अशी प्रत्येक खेळाडूची इच्छा असते, पण टीम कॉम्बिनेशनमुळे बाहेर बसावं लागू शकतं, कारण संघ हा सर्वात महत्वाचा असतो, असंही सिराजने नमूद केलं.

 

Mohammed Siraj and Kuldeep Yadav share their emotions after being crowned champions. 🏆❤#Champions #INDvNZ pic.twitter.com/Omqg91W4nr

— Star Sports (@StarSportsIndia) March 8, 2026

सोशल मीडियावर सर्वाधिक व्हायरल होत असलेली ही छोटी क्लिप पाहिल्यानंतर लोकांनी त्यावर खूप प्रतिक्रिया दिल्या आहेत. ” एखाद्याला पाणी देणं हे खूप चांगलं, शुभ, पुण्याचं काम आहे “, असं एकाने लिहीलं. तर “मित्रा, आजकाल इतके खरं कोण बोलतं ?” असा सवाल एका युजरने विचारला. “विचारपूर्वक कमेंट करा मित्रांनो. डीएसपी साहेब तुम्हाला तुरुंगात घेऊन जातील आणि काठीने मारतील.” अशी मजेशीर कमेंटही एका युजरने केली आहे.

 

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • RR vs RCB : वैभवची विस्फोटक खेळी, राजस्थानचा विजयी चौकार, आरसीबीचा 6 विकेट्सने धुव्वा
  • होम लोन घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! एप्रिल 2026 मध्ये ‘या’ सरकारी बँका देताहेत सर्वात स्वस्त कर्ज
  • Cars Under 5 Lakh : पहिल्यांदा कार घेणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी! 5 लाखांच्या बजेटमध्ये घरी आणा ‘या’ दमदार कार
  • विमानतळावर ३८ कोटींचे ३० किलो सोने जप्त, २४ महिलांनी कुठे-कुठे लपवले सोने ?
  • IPL 2026 : आयपीएल स्पर्धेत वेगवान अर्धशतक करणारे भारतीय फलंदाज, नंबर 1 कोण?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in