• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

MI vs RCB : आधी धोनी आता रोहित-विराट आयपीएलमधून OUT का? इंजरीबद्दल समोर आली महत्वाची अपडेट

April 13, 2026 by admin Leave a Comment

Rohit Sharma-Virat Kohli : आयपीएल 2026 मध्ये भारतीय क्रिकेटमधील स्टार खेळाडूंच्या मागे दुखापतीचं शुक्लकाष्ट लागलं आहे. आयपीएल 2026 च्या सीजनला सुरुवात होणार त्याच दिवशी चेन्नई सुपर किंग्सचा स्टार खेळाडू महेंद्र सिंह धोनीला दुखापत झाल्याची बातमी आली. धोनी पुढचे दोन आठवडे टुर्नामेंटमध्ये खेळणार नाही अशी माहिती सीएसकेकडून देण्यात आली. धोनी आता मैदानात परतणार अशा चर्चा सुरु झालेल्या असतानाच काल मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु सामन्याच्यावेळी रोहित शर्मा-विराट कोहलीला दुखापत झाल्याची बातमी आली. त्यामुळे दोन्ही क्रिकेटर्सच्या लाखो फॅन्सचा मोठा हिरमोड झाला आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहलीला फलंदाजी दरम्यान ही दुखापत झाली.

रिपोर्ट्सनुसार विराट कोहलीला अँकल इंजरीचा त्रास झाल्याने तो फलंदाजीनंतर फिल्डिंगसाठी मैदानात उतरला नाही. तो ड्रेसिंग रुममध्येच बसून होता. विराट कोहलीने 38 चेंडूत 50 धावा फटकावल्या. विराट कोहलीला ज्या प्रमाणे फलंदाजी करताना अँकल इंजरी झाली तसाच सेम रोहित शर्माला फलंदाजी करताना हॅमस्ट्रिंगचा त्रास झाला. फलंदाजी दरम्यान रोहितला त्रास होत असल्याचं दिसलं. अखेरीस त्याने रिटायर्ड हर्ट होऊन मैदान सोडण्याचा निर्णय घेतला.

तो पुन्हा फलंदाजीसाठी उतरला नाही

रोहित रिटायर्ड हर्ट होऊन मैदानाबाहेर परतला, त्यावेळी त्याने 13 चेंडूत 19 धावा केल्या होत्या. रोहित रिटायर्ड होऊन गेल्यानंतर तो पुन्हा फलंदाजीसाठी उतरला नाही, यावरुन त्याची दुखापत किती गंभीर आहे ते लक्षात येतं. रोहितची दुखापत कशी आहे, या बद्दल सध्या काही अपडेट नाहीय. मुंबई इंडियन्सचा कॅप्टन हार्दिक पंड्याने सुद्धा मॅच नंतर रोहितच्या इंजरीबद्दल काही अपडेट दिली नाही.

रजत पाटीदार विराटच्या दुखापतीबद्दल काय बोलला?

विराट कोहलीच्या दुखापतीबद्दल मात्र रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा कॅप्टन रजन पाटीदारने अपडेट दिली आहे. विराटची दुखापत किती गंभीर आहे, या बद्दल सध्या माहिती नाहीय. पण असं वाटतं की सगळं ठीक आहे. विराटला सध्या कुठला त्रास नाहीय.

मुंबईचा किती धावांनी पराभव

वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने पहिली बॅटिंग केली. त्यांनी 20 ओव्हर्समध्ये 4 विकेट गमावून 240 धावा केल्या. प्रत्युत्तरात 241 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायला उतरलेल्या मुंबई इंडियन्सने 20 ओव्हर्समध्ये 5 विकेट गमावून 222 धावा केल्या. मुंबईचा 18 धावांनी पराभव झाला.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • कल्याणमध्ये तरुणावर चॉपरने जीवघेणा हल्ला; पोलिसांच्या तपासावर गंभीर प्रश्नचिन्ह
  • तीन दिवसानंतर थेट खातं बंद, पैसेच काढता येणार नाही, तुमचं तर या बँकेत खातं नाही ना?
  • युझवेंद्र चहलने ते व्हिडीओ पाठवत मेसेज केला; ‘गंदी बात’ अभिनेत्रीने सर्वांसमोर चॅटच दाखवले
  • MI vs RCB : हार्दिक पंड्या कॅप्टन म्हणून वेगळा नियम का? असा भेदभाव का, चौथा अंपायर कुठे होता? त्याला दिसलं नाही का हे?
  • अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेन सुरु होण्याआधीच मोठा पराक्रम, अवघ्या 3 तासात…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in