• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Maratha Empire Map: मराठा साम्राज्याचा नकाशा NCERT पुस्तकातून हटवला, राजपूत घराण्यांचा दबाव? नागपूर राजघराण्याचे मुधोजी राजे भोसले आक्रमक

February 25, 2026 by admin Leave a Comment


Mudhoji Raje Bhosale : NCERT इयत्ता ८ वीच्या पाठ्य पुस्तकातून मराठा साम्राज्याचा नकाशा हटल्याचा वाद पेटला आहे. नागपूर राजघराण्याचे मुधोजी राजे भोसले यांनी याविषयावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,शिक्षण मंत्री आणि NCERT ला त्यांनी पत्र लिहिलं आहे. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत या संदर्भात चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले. याप्रकरणात फडणवीस यांनी लक्ष घालण्याचे आश्वासन दिल्याचे भोसले म्हणाले.

काय आहे प्रकरण?

1759 मध्ये मराठा साम्राज्याचा कटक ते अटक असा विस्तार दाखवणारा नकाशा NCERT च्या इयत्ता आठवीच्या पुस्तकात समाविष्ट करण्यात आला होता. पण हा नकाशा चुकीचा असून राजस्थानधील काही भागांवर मराठ्यांचं अधिपत्यही नव्हतं आणि त्यांनी कधी चौथाई, देशमुख वसूल केली नसल्याचा राजस्थानमधील राजघराण्यांचा दावा होता. राजस्थानमधील काही राजघराण्यांनी हा नकाशा हटवण्याची मागणी केली. वादाच्या पार्श्वभूमीवर एनसीईआरटीने शैक्षणिक वर्ष 2025-2026 साठी आठवीच्या पुस्तकातून संबंधित नकाशा हटवला. नवीन पुस्तकात हा नकाशा वगळण्यात आला. त्याकडे नागपूर घराण्याचे मुधोजीराजे भोसले यांनी लक्ष वेधले आहे.

मराठा इतिहासाची गळचेपी का?

नागपूर राजघराण्याचे मुधोजी राजे भोसले यांनी महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री दादाजी भुसे तसेच एनसीआरटीला सुद्धा या संदर्भात पत्र पाठवत याप्रकरणी तीव्र निषेध नोंदवला. महाराष्ट्राचा तेजस्वी मराठा इतिहासाची गळचेपी? होत असल्याचा म्हणत वातावरण तापले आहे. मराठा साम्राज्याच्या ध्वज पुस्तकाचा कागदावरच नाही तर तो या मातीच्या कणाकणात आहे. राजस्थानसह विस्ताराचा नकाशा ‘जसाच्या तसा’ पूनर्समावेश करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

NCERT ला लिहिलेले पत्र इथं वाचा  Maharaja Of Nagpur – NCERT – PM

चौथाई, देशमुखी वसुलीचे पुरावे

राजस्थान मधील जयपूर जोधपूर आणि उदयपूर यासारख्या प्रमुख सत्ता मराठ्यांच्या अधिपत्याखाली होत्या तिथून चौथी आणि सर्व देशमुखी सुद्धा वसूल केली जात होते असे पुरावे आहेत. ऐतिहासिक असंख्य पुरावे असताना काही समाजाच्या दबावाचा आरोप, राजस्थानचा मोठा भूभाग समाविष्ट होता तो नकाशा तात्काळ पुन्हा समाविष्ट करण्याची मागणी भोसले यांनी केली.

महाराष्ट्र सरकारने महराष्ट्राची अस्मिता म्हणून ठोस भूमिका मांडून केंद्र आणि NCERT कडे मांडून आक्रमक पाठपुरावा करावा. इतिहास वळवण्याचा प्रयत्न सहन केला जाणार नाही,मराठ्यांचा इतिहास हा देशाचा कणा आहे, तो वाकवण्याचा प्रयत्न करू नये, तातडीने याची दखल महाराष्ट्र सरकारने घ्यावी आणि पाठपुरावा करावा अशी मागणी मुधोजी राजे भोसले यांनी केली आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • आता स्कूटर नाही, चालतं-फिरतं गॅजेट, टचस्क्रीनसह येणारे ‘हे’ 5 इलेक्ट्रिक स्कूटर पाहा
  • एप्रिल 2026 मधील विवाहाच्या शुभ मुहूर्तांची जाणून घ्या ही संपूर्ण यादी
  • Maruti Alto आणि Brezza वर मोठा डिस्काउंट, जाणून घ्या नवीन किमती
  • घराची फरशी पुसताना ‘या’ वास्तु नियमांचे पालन करा, घरातील आर्थिक चणचण होईल दूर.
  • ‘या’ दिवशी आहे वरुथिनी एकादशी, जाणून घ्या शुभ वेळ आणि पूजेची पद्धत

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in