• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Mahashivratri 2026 : महाशिवरात्रीच्या दिवशी मंदिरातून घरी आणा या गोष्टी, कधीच भासणार नाही पैशांची कमतरता

February 7, 2026 by admin Leave a Comment


पुढल्या रविवारी अर्थात 15 फेब्रुवारी 2026 रोजी महाशिवरात्र आहे.  प्रत्येक शिव भक्त या दिवसाची आतुरतेने वाट पाहत असतो. या दिवशी भगवान शिव पहिल्यांदा शिवलिंगाच्या रूपात प्रकट झाले. म्हणूनच महाशिवरात्रीला शिवलिंगाचा विशेष अभिषेक केला जातो.

असे मानले जाते की महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर मनोभावे अभिषेक केल्याने व्यक्तीच्या जीवनात पूर्ण आनंद येतो, ग्रहांचे दुष्परिणाम दूर होतात आणि सुरक्षित आर्थिक परिस्थिती सुनिश्चित होते. त्यासोबतच महाशिवरात्रीला भगवान शंकराच्या मंदिरात अभिषेक केल्यानंतर काही गोष्टी घरी आणल्या पाहिजेत. ज्याने तुम्हाला कधीच पैशाची कमतरता भासणार नाही. चला तर मग आजच्या लेखात आपण याबद्दल जाणून घेऊयात.

महाशिवरात्रीच्या दिवशी  या गोष्टींनी करा अभिषेक

पाण्याचा एक तांब्या सर्व समस्या दूर करतो. असे म्हटले जाते की भगवान शिव यांना फक्त एक तांब्या पाणी अर्पण केल्याने ते प्रसन्न होतात आणि ते त्यांच्या भक्तांच्या अपूर्ण इच्छा पूर्ण करतात. प्रथम, पाण्याने अभिषेक करा.

त्यानंतर, शिवलिंगाला थोडेसे दूध अर्पण करा. असे मानले जाते की यामुळे आर्थिक स्थैर्य येते.

शिवलिंगावर दह्याचा अभिषेक करा. दह्याचा थंडावा भगवान शिवांना शांत करतो. ज्यामुळे त्यांचे आशीर्वादोन आपला मानसिक ताण कमी होतो आणि समस्या दूर करतात.

यानंतर एकाधारेने मध शिवलिंगावर अर्पण करा. हा उपाय तुम्हाला वैवाहिक आनंदासाठी आणि आजारापासून मुक्ततेसाठी फायदेशीर आहे.

मुलांशी संबंधित समस्या सोडवण्यासाठी महाशिवरात्रीला भगवान शंकराच्या पिंडीला तुपाचा अभिषेक करावा.

काळ्या तीळाने अभिषेक केल्याने भगवान शिव वाईट नजरेपासून तुमचे रक्षण करते. असे म्हटले जाते की यामुळे तांत्रिक अडथळे दूर होतात.

यानंतर सर्व पूजा साहित्यांसह पार्वती माता आणि भगवान शिव यांची पूजा करा.

महाशिवरात्रीला मंदिरातून ही वस्तू घरी आणा

बेलपत्र – महाशिवरात्रीला शिवलिंगावर अभिषेक केल्यानंतर, भगवान शिवाला अर्पण केलेले बेलपत्र घरी आणणे शुभ आहे. तुम्ही हे बेलपत्र तुमच्या तिजोरीत किंवा पर्समध्ये ठेवू शकता. असे मानले जाते की यामुळे पैशाचा ओघ कधीही कमी होत नाही.

पार्वती मातेला अर्पण केलेल्या वस्तू – महाशिवरात्रीला अनेकजण पार्वती मातेलला वैवाहिक आनंदाच्या वस्तू अर्पण करतात. मंदिरात पार्वती मातेला अर्पण केलेल्या बांगड्या, चोळी आणि सिंदूर घरी आणून परिधान कराव्यात. असे मानले जाते की यामुळे अखंड सौभाग्य मिळते, पतीला दीर्घायुष्य मिळते आणि वैवाहिक जीवनात प्रेम वाढते.

पाणी – अभिषेकादरम्यान भगवान शिवाला अर्पण केलेले थोडेसे पाणी एका भांड्यात गोळा करा. नंतर ते घराच्या प्रत्येक कोपऱ्यात शिंपडा. तुम्ही हे अभिषेकाचं पाणी आजारी व्यक्तीवर देखील शिंपडू शकता. यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होण्यास मदत होते आणि आरोग्य सुधारते.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)



Source link

Filed Under: lifestyle

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • कारच्या डॅशबोर्डवर ‘या’ मूर्त्या ठेवणे पडू शकते महागात, जाणून घ्या हे वास्तू नियम
  • जरांगे पाटील यांची मानसिकता तपासली पाहिजेत, लक्ष्मण हाके यांचा जोरदार हल्ला
  • WI vs SCO T20 WC Result: वेस्ट इंडिजने स्कॉटलँडला 35 धावांनी नमवलं, हेटमायर-शेफर्ड चमकले
  • शरद पवारांची रोहित आणि पार्थ पवारांसोबत चर्चा, वेगवेगळ्या चर्चांना उधाण; त्या फोटोचा नेमका अर्थ काय?
  • Mahashivratri 2026 : महाशिवरात्रीच्या दिवशी मंदिरातून घरी आणा या गोष्टी, कधीच भासणार नाही पैशांची कमतरता

Recent Comments

No comments to show.

Archives

  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in