
अमेरिका–इस्रायल–इराण युद्धामुळे मुळे निर्यात ठप्प झाल्याने कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये शेतमालाची विक्रमी आवक झाली आहे. शेतमाल मोठ्या प्रमाणात आल्याने भाजी फळे फुलांचा भाव घसरला असून ग्राहक नसल्याने बाजारातच शेतमाल पडून आहे, तो सडण्याची वेळ शेतकरी-व्यापारी चिंतेत आहेत. नाशिकमध्ये आजपासून ‘कृषी कुंभ’ प्रदर्शन चे आयोजन करण्यात आलं आहे. शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख, एआय दालन, जुगाड ते तंत्रज्ञान स्पर्धा आणि परिसंवादांचे आयोजन यामध्ये करण्यात आलंय. कृषी उद्योग व बाजारपेठेतील संधींबाबत मार्गदर्शन करण्याच्या उद्देशाने 12 ते 16 मार्च या कालावधीत ‘कृषी कुंभ’ प्रदर्शन पार पडेल. बुलढाणा जिल्ह्यात मुली सह विवाहित महिला अचानक बेपत्ता होण्याचा सत्र थांबता थांबत नाहीये. बुलढाणा जिल्ह्यातून सरासरी दररोज पाच ते सहा मुली किंवा विवाहित महिला बेपत्ता होत आहेत. काल गेलेल्या 24 तासात जिल्ह्यातून एका विवाहितेसह पाच मुली व एक युवक असे सहा जण बेपत्ता झाल्याची नोंद आहे. यासह महाराष्ट्र, देश विदेश, क्रीडा, मनोरंजन क्षेत्रातील प्रत्येक महत्वाच्या बातमीचे अपडेटस जाणून घेण्यासाठी दिवसभर टीव्ही9 मराठीचा हा ब्लॉग फॉलो करा.
Leave a Reply