
राज्यात अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. यादरम्यानच काल अनेक भागात मोठी गारपीट झाली. या गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून आजही भारतीय हवामान विभागाकडून पावसाचा मोठा अंदाज अनेक जिल्ह्यांमध्ये वर्तवण्यात आला. यासोबतच काही भागात उष्णता वाढत आहे. काल राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दाैऱ्यावर होते, यादरम्यान त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. एकनाथ शिंदे यांच्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगताना दिसत आहेत. इराण अमेरिका युद्धामुळे राज्यासह देशात एलपीजी गॅसचा मोठा तुटवडा निर्माण झाला. व्यावसायिक गॅस सिलेंडर मिळणे बंद झाल्याने अनेक हॉटेल बंद आहेत. यासोबतच खानावळी चालकांवरही खानावळ बंद ठेवण्याची वेळ आली. मुंबईतील 40 टक्के हॉटेल आज बंद आहेत. एलपीजी गॅसचा तुटवडा निर्माण झाल्याने अनेकांचे रोजगार जाण्याची वेळ आली. यासह महाराष्ट्र, देश विदेश, क्रीडा, मनोरंजन क्षेत्रातील प्रत्येक महत्वाच्या बातमीचे अपडेटस जाणून घेण्यासाठी दिवसभर टीव्ही9 मराठीचा हा ब्लॉग फॉलो करा.
Leave a Reply