
राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने मोठी खळबळ उडाली. अजित पवार यांचा मुंबईहून बारामतीकडे जाताना विमान अपघात झाला. अजित पवार यांच्या निधनानंतर राज्यातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली आहेत. अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. मात्र, पवार कुटुंबाला याची कोणतीही कल्पना नव्हती. यावर स्पष्टपणे बोलताना शरद पवार दिसले. आता दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विलिगीकरण होणार नसल्याचे स्पष्ट आहे. रोहित पवार यांनीही अजित पवार यांच्या तेराव्यानंतर यावर बोलणार असल्याचे म्हटले. अजित पवार यांच्या निधनानंतर शंकाही उपस्थित केली जात आहे. सुनेत्रा पवार या लवकरच दिल्ली दाैऱ्यावर जाणार असल्याचे सांगितले जात आहे. दिल्ली दाैऱ्यात त्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अमित शहा यांची भेट घेणार आहेत.
Leave a Reply