
मुंबई महापौरपदाबाबत भाजपकडून कोणतीही तडजोड होणार नाही अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. शिंदे गटाच्या भूमिकेमुळे दिल्लीतील नेतृत्वाने राज्यातील नेत्यांना निर्देश दिल्याची चर्चा आहे. कार्यकर्त्यांच्या भावनांचा सन्मान राखण्यावर भर देण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत. इतकंच नव्हे तर मित्रपक्षांशी कडवटपणा टाळण्याचाही सल्ला देण्यात आला आहे. मुंबई महापौरपद आपल्याकडेच राहावं, यावर भाजप ठाम असल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे. ठाण्याच्या महापौरपदासाठीही भाजपने दोन वर्षांचा दावा कायम ठेवला आहे. तर मुंबई आणि अन्य महापालिकेत महायुतीत सन्मानपूर्वक तोडगा काढा असे निर्देश दिल्लीतील नेतृत्त्वाने दिले आहेत. मुंबईच्या महापौर पदाचा निर्णय दिल्लीमध्ये होणार असून आज महाराष्ट्रातील शिवसेनेचे प्रमुख नेते दुपारनंतर दिल्लीमध्ये जाणार आहेत. संध्याकाळी दिल्लीतील महाराष्ट्र सदन इथं शिवसेनेचे सरचिटणीस राहुल शेवाळे आणि भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांच्यात बैठक होणार आहे. मुंबईतील महापौरपद, स्थायी समिती अध्यक्ष आणि इतर समित्यांबाबतही प्राथमिक चर्चा होणार असल्याची माहिती समोर येत आहे. यासोबतच निवडणुकीसंदर्भातील इतर अपडेट्स, राज्याभरातील घडामोडी, राष्ट्रीय पातळीवरील बातम्या जाणून घेण्यासाठी हा ब्लॉग फॉलो करा..
Leave a Reply