• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Iran-Israel War : भारताचं टेन्शन वाढलं ! तेल, गॅस नंतर आता हे मोठं संकट? हातात पैसा टिकणार कसा?

March 11, 2026 by admin Leave a Comment


अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यांनंतर, पश्चिम आशियातील युद्धाचा विध्वंस वाढतच आहे. गेल्या 12 दिवसांपासून युद्ध सुरू आहे. या युद्धादरम्यान प्रमुख जलमार्ग प्रभावीपणे रोखल्यामुळे आणि पुरवठा साखळीत व्यत्यय आल्यामुळे कच्च्या तेलाच्या आणि वायूंच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. त्यामुळे भारतात गॅस टंचाई जाणवतलआहे. मात्र याच दरम्यान, आता आणखी एक संकट उद्भवले आहे. रिपोर्ट्सनुसार. या युद्धाचा परिणाम भारताच्या औषध उद्योगावर होऊ लागला आहे. या अहवालांनुसार, भारताच्या औषध पुरवठा साखळीवर दबाव वाढत आहे, ज्यामुळे औषध निर्मितीमध्ये वापरल्या जाणाऱ्या कच्च्या मालाच्या किमतीत सातत्याने वाढ होत आहे.

एका वृत्तवाहिनीच्या रिपोर्टमध्ये औषध उद्योगाच्या अधिकाऱ्यांच्या हवाल्याने म्हटलं आहे की, “स्टार्टिंग मटेरियल्स” (केएसएम) आणि “अ‍ॅक्टिव्ह फार्मास्युटिकल इंग्रिडिएंट्स” (एपीआय) च्या किमती वाढू लागल्या आहेत. केएसएम आणि एपीआय हे औषध निर्मितीसाठी आवश्यक घटक आहेत. गेल्या आठवड्यात जागतिक तणाव, डॉलरमधील चढउतार आणि पुरवठ्यातील व्यत्यय यामुळे किमती 5 ते 100 टक्क्यांपर्यंत वाढल्या आहेत. कंटेनर जहाजांच्या कमतरतेमुळे भारतीय औषध कंपन्यांना एपीआयचा सर्वात मोठा पुरवठादार असलेल्या चीनकडून कच्च्या मालाचा पुरवठा विस्कळीत होत आहे. चीन हा भारतीय औषध कंपन्यांना एपीआयचा सर्वात मोठा पुरवठादार आहे. परिणामी, वाढत्या उत्पादन खर्चामुळे औषधांच्या किमती वाढण्याची अपेक्षा आहे. शिवाय, शिपिंग खर्चात मोठी वाढ झाली आहे. प्रत्येक शिपमेंटसाठी मालवाहतूक शुल्क दुप्पट झाले आहे आणि 4 ते 8 हजार डॉलर्सपर्यंतचे अतिरिक्त अधिभार आकारले जात आहेत.
जर हे युद्ध असंच सुरू राहिलं तर या महत्त्वाच्या कच्च्या मालाची कमतरता भासू शकते, असा इशारा अधिकाऱ्यांनी दिला आहे.

औषधं बनवण्याच्या किमतीत वाढ

एका वृत्तपत्रातील रिपोर्टनुसार, औषध उद्योगातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले आहे की आयात कंपन्या कच्च्या मालाच्या वाढत्या किमतींचा भार थेट औषध कंपन्यांवर टाकू लागल्या आहेत. एका उद्योग अधिकाऱ्याने सांगितले की API च्या किमती वाढण्यासोबतच, औषधी सॉल्व्हेंट्सच्या किमतीतही 20-30 % वाढ झाली आहे, तर शिपिंग कंपन्या देखील अतिरिक्त शुल्क आकारत आहेत. परिणामी, आयातदार स्वतः अतिरिक्त खर्च सहन करण्यास असमर्थ आहेत.

उद्योगातील एका अधिकाऱ्याचे म्हणणे आहे की, API किमतींमध्ये वाढ होण्यासोबतच, औषधी सॉल्व्हेंट्ससह अनेक प्रमुख कच्च्या मालाच्या किमतींमध्येही लक्षणीय वाढ झाली आहे, असे उद्योगाच्या आकडेवारीनुसार म्हटले आहे. उदाहरणार्थ, डिसेंबरच्या तुलनेत ग्लिसरीनच्या किमती अंदाजे ६४% वाढल्या आहेत, तर पॅरासिटामॉलच्या किमती अंदाजे २६% वाढल्या आहेत. इनपुट खर्चातही २०-३०% वाढ झाली आहे, तर शिपिंग कंपन्या अतिरिक्त शुल्क आकारत आहेत. परिणामी, आयातदार स्वतः अतिरिक्त खर्च सहन करण्यास जवळजवळ असमर्थ आहेत.

इंडस्ट्रीतील आकडेवारीनुसार, अनेक प्रमुख कच्च्या मालाच्या किमती झपाट्याने वाढल्या आहेत. उदाहरणार्थ, डिसेंबरच्या तुलनेत ग्लिसरीनच्या किमती अंदाजे 64 % वाढल्या आहेत, तर पॅरासिटामॉलच्या किमती अंदाजे26 % वाढल्या आहेत.

औषधे बनवण्यात पेट्रोकेमिकल्सची भूमिका काय ?

औषध उद्योगातील एका तज्ज्ञाच्या सांगण्यानुसार की फार्मास्युटिकल सॉल्व्हेंट्स हे पेट्रोकेमिकल्सपासून बनवले जातात आणि मध्य पूर्वेतील सुरू असलेल्या संघर्षाचा जागतिक तेल पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. यामुळे केवळ एका आठवड्यात या सॉल्व्हेंट्सच्या किमती लक्षणीयरीत्या वाढल्या आहेत.

“व्यापारी कच्च्या मालाचे ऑर्डर घेत नसल्याने औषधांचा तुटवडा निर्माण होऊ शकतो.” असं एक अधिकारी म्हणाले. “सॉल्व्हेंटच्या किमती वाढल्या आहेत. शिवाय, छोटे व्यापारी आणि पुरवठादार किमती आणखी वाढवून युद्ध परिस्थितीचा फायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत.” भारत त्याच्या एपीआय, इंटरमीडिएट्स आणि आवश्यक साहित्यापैकी सुमारे 65 ते 70 टक्के चीनमधून आयात करतो.

का वाढल्या किमती ?

तज्ञांच्या मते, अनिश्चिततेच्या काळात डॉलरची मजबूती हे याचे सर्वात मोठे कारण आहे. औषध उद्योगातील बहुतेक कच्च्या मालाची खरेदी-विक्री डॉलरमध्ये होते. म्हणून, डॉलर मजबूत होताना, आयात खर्च आपोआप वाढतो.
दुसरं कारण म्हणजे सॉल्व्हेंट्सच्या किमतीत वाढ. काही प्रकरणांमध्ये, गेल्या काही दिवसांत सॉल्व्हेंट्सच्या किमतीत 20 ते 25 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

सागरी मार्ग खोळंबले

याशिवाय लॉजिस्टिकमध्येही अडथळे येत आहेत. मुंबईतील एका औषध कंपनीच्या उद्योग अधिकाऱ्याच्या सांगण्यानुसार, ” सुरक्षेची वाढती चिंता आणि प्रमुख समुद्री मार्गांच्या अडथळ्यामुळे, जहाजे आणि कंटेनर यायला विलंब होत आहे, किंवा ते अडकून पडत आहेत, ज्यामुळे औषध कच्च्या मालाच्या वाहतुकीवर परिणाम होत आहे. अनेक जहाजे बंदरांवर परतली नसल्याने कंटेनरची कमतरता आहे.” असं त्यांनी नमूद केलं.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • CSK vs KKR : केकेआरसमोर पाचव्या सामन्यात विजयाचं खातं उघडण्याचं आव्हान, चेन्नईला घरच्या मैदानात पराभूत करणार?
  • मुलींनो या मुलांच्या प्रेमात पडाल तर होईल आयुष्य उद्ध्वस्त, चाणक्य नीतीच्या नियमांकडे करू नका दुर्लक्ष!
  • IPL 2026 Points Table : हैदराबादला दुसऱ्या विजयासह मोठा फायदा, थेट 3 संघांना पछाडलं, नंबर 1 कोण?
  • SRH vs RR : प्रफुल हिंगे-साकिब हुसैनचा कहर, हैदराबादने विजयरथ रोखला, राजस्थानचा 57 धावांनी धुव्वा
  • GK : भारतातील सर्वात लहान केंद्रशासित प्रदेश कोणता? निसर्ग सौंदर्य पाहून प्रेमात पडाल

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in