• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

IPL 2026, MI vs KKR : मुंबई इंडियन्स आणि कोलकात्याचा कसा आहे हेड टू हेड रेकॉर्ड, जाणून घ्या

March 28, 2026 by admin Leave a Comment


आयपीएल 2026 स्पर्धेतील दुसऱ्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा सामना कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात होत आहे. दोन्ही संघ या स्पर्धेतील पहिल्या विजयासाठी आतुर असणार आहे. मागच्या पर्वात दोन्ही संघाची कामगिरी काही खास राहिली नव्हती. मुंबई इंडियन्सने टॉप 4 मध्ये जागा मिळवली. पण अंतिम फेरी काही गाठू शकले नाहीत. तर केकेआरचा प्रवास साखळी फेरीतच संपुष्टात आला होता. पण यावेळी दोन्ही संघ पुन्हा एकदा नव्या जोमाने उतरणार आहेत. मुंबई इंडियन्सने पाच वेळा, तर कोलकाता नाईट रायडर्सने तीन वेळा विजेतेपद पटकावले आहे. यावेळी दोन्ही संघ आपल्या विजेतेपदांच्या संख्येत वाढ करण्याचा प्रयत्न करतील, यात काही शंका नाही. दोन्ही संघांनी आपल्या नेतृत्वात बदल केलेला नाही. केकेआरची धुरा अजिंक्य रहाणे, तर मुंबई इंडियन्सची धुरा हार्दिक पांड्याकडे आहे. मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात आतापर्यंतचा रेकॉर्ड कसा आहे. कोणता संघ भारी पडला आहे, हे सर्व काही जाणून घेऊयात

दोन्ही संघात हेड टू हेड कामगिरी कशी?

आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात कोलकाता नाईट रायडर्स आणि मुंबई इंडियन्स 35 वेळा भिडले आहेत. यात मुंबईने 24 सामन्यात विजय मिळवला आहे. तर कोलकाता नाईट रायडर्स फक्त 11 सामन्यात विजय मिळवू शकली आहे. त्यामुळे या सामन्यात मुंबई इंडियन्सचं पारडं जड दिसत आहे. मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स वानखेडे स्टेडियमवर 12 वेळा आमनेसामने आले होते. यात मुंबई इंडियन्सने 10 वेळा, तर केकेआर फक्त 2 सामन्यात विजयी ठरली आहे.

सर्वाधिक धावांचा विक्रम कोणत्या संघाच्या नावावर?

मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स या संघापैकी कोणत्या संघाने सर्वाधिक धावा केल्या आहेत? असा प्रस् न पडल्याशिवाय राहात नाही. तर त्याचं उत्तर कोलकाता नाईट रायडर्स असं आहे. कोलकाता नाईट रायडर्सने मुंबई इंडियन्सविरुद्ध 232 धावा केल्या आहे. तर कमी धावांवर बाद होण्याचा विक्रमही कोलकाता नाईट रायडर्सच्या नावावर आहे. कोलकात्याचा संघ फक्त 67 धावांवर बाद झाला होता. तर मुंबईच्या 68 धावा आहेत.

नाणेफेकीचा कौल काय सांगतो?

मुंबई इंडिनयन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स 35 वेळा आमनेसामने आले आहे. यापैकी 20 सामन्यात मुंबईने, 15 सामन्यात कोलकात्याने बाजी मारली. मुंबईने नाणेफेक जिंकताना 14 वेळा सामना जिंकला आहे. तर कोलकात्याने फक्त 5 वेळा नाणेफेक जिंकल्यानंतर विजय मिळवला आहे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • अक्षय तृतीयेच्या दिवशी ‘या’ वस्तू खरेदी करू नका, नाहीतर…
  • Vastu Shastra : घराला नजर लागलीये? सर्व गोष्टी वाईटच घडतायेत? मग करा वास्तुशास्त्रातील हा सर्वात प्रभावी उपाय
  • Chanakya Niti : आयुष्यात यशस्वी व्हायचंय? मग चाणक्यांचे हे चार सल्ले ऐकाच
  • जोडीदार कसा निवडावा? चाणक्य नीतीमधील मोलाचा सल्ला कोणालाच नाही माहिती; चुक केल्यास आयुष्यभर रडण्याची वेळ!
  • Vastu Tips : फक्त चेहऱ्याचं सौंदर्यच वाढवत नाही, तर मुल्तानी मातीमुळे घराची भरभराट सुद्धा होते, कशी ते समजून घ्या

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in