• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

IPL 2026: वैभव सूर्यवंशी जाणीवपूर्वक करतोय दिग्गज गोलंदाजांना लक्ष्य! असं कारण तर नाही ना?

April 11, 2026 by admin Leave a Comment

आयपीएल स्पर्धेतील 16 सामन्याचा खेळ संपला असून वैभव सूर्यवंशीच्या खेळीची चर्चा रंगली आहे. कारण त्याने आक्रमक खेळी करत सर्वच संघातील दिग्गज गोलंदाजांना सळो की पळो करून सोडलं. वैभव सूर्यवंशीने जसप्रीत बुमराह, जोश हेझलवूड, ट्रेंट बोल्ट, भुवनेश्वर कुमार, मॅट हेनरीसारख्या दिग्गज गोलंदाजांवर जोरदार प्रहार केला. आतापर्यंत या गोलंदाजांनी विराट कोहली, स्टीव्ह स्मिथ, जो रूट, केन विल्यमसन आणि रोहित शर्मासारख्या दिग्गज खेळाडूंना अडचणीत आणलं. पण वैभव सूर्यवंशीने वयाच्या 15व्या वर्षी या गोलंदाजांवर प्रहार केला. त्याची फलंदाजी पाहून क्रीडाप्रेमी आणि तज्ज्ञांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. कारण समोर दिग्गज गोलंदाज असताना त्याच्या फलंदाजीत काहीच फरक पडलेला नाही. उलट दिग्गज गोलंदाजांविरुद्ध अजून आक्रमकपणे खेळतो. वैभव सूर्यवंशी जाणीवपूर्वक दिग्गज गोलंदाजांना लक्ष्य करतो का? असा प्रश्न पडतो.

आयपीएल स्पर्धेत 2024 मध्ये वैभव सूर्यवंशीने पदार्पण केलं होतं. यावेळी त्याने पहिल्याच चेंडूवर षटकार मारला होता. त्यानंतरच्या सामन्यात 35 चेंडूत शतक ठोकलं होतं. आता दुसऱ्या पर्वातही त्याचा आक्रमक बाणा सुरू आहे. या पर्वात चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध मॅट हेनरीच्या पहिल्याच चेंडूवर चौकार ठोकला. गुजरात टायटन्सविरुद्ध त्याने मोहम्मद सिराजच्या पहिल्याच चेंडूवर चौकार लगावला.मुंबई इंडियन्सविरुद्ध ट्रेंट बोल्टला लक्ष्य करत पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकला. इतकंच काय तर बुमराहच्या पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. आरसीबीविरुद्ध भुवनेश्वर कुमार आणि जोश हेझलवूड यांच्या पहिल्याच चेंडूवर चौकार मारले.

Does Vaibhav suryavanshi targets big bowlers purposely?

I like to think so.

— Irfan Pathan (@IrfanPathan) April 10, 2026

वैभव सूर्यवंशीचा आक्रमक बाणा पाहून माजी क्रिकेटपटू इरफान पठाणने एक प्रश्न विचारला आहे. तसेच त्याचं उत्तरही दिलं आहे. इरफानने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट केले, “वैभव सूर्यवंशी मुद्दाम मोठ्या गोलंदाजांना लक्ष्य करतो का? मला तसा विचार करायला आवडेल.” इरफान पठाणचं म्हणणं योग्यच आहे. कारण अनेक खेळाडू अधिक बलाढ्य प्रतिस्पर्ध्यांशी सामना करणं आवडतं. यामुळे विरोधी संघाचे मनोधैर्य पूर्णपणे खचते. ही रणनिती बुद्धिबळ किंवा युद्धनीतीसारखीच आहे. यात मंत्री किंवा सेनापतीवर सुरूवातीला प्रहार करून विरोधी संघावर दबाव आणला जातो. यामुळे सामना किंवा युद्ध जिंकणे सोपे होते.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • IPL 2026, CSK vs DC: नाणेफेकीचा कौल दिल्लीच्या बाजूने, गोलंदाजी घेत अक्षर पटेल म्हणाला..
  • IPL 2026, CSK vs DC: नाणेफेकीचा कौल दिल्लीच्या बाजूने, गोलंदाजी घेत अक्षर पटेल म्हणाला..
  • जेवणासाठी शोधत होते हॉटेल पण चुकून घुसले अंत्यविधीच्या ठिकाणी, पुढे जे घडलं ते…, आयुष्यात कधी विसणार नाहीत
  • ओठांवर लाल लिपस्टिक दिसताच भयानक शिक्षा; एखाद्या महिलेने हिंमत केल्यास…हादरवून टाकणारा कायदा!
  • युद्धविराम नाहीच… इस्रायलकडून पुन्हा भीषण हल्ल्यांना सुरुवात, मध्यपूर्वेत तणाव वाढला

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in