• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

IPL स्पर्धेतील रटाळ सामना म्हणून मुंबई इंडियन्स आणि आरसीबी सामन्याची चर्चा, झालं असं की..

April 13, 2026 by admin Leave a Comment


आयपीएल 2026 स्पर्धा प्रत्येक सामन्यानंतर पुढे सरकत आहे. गुणतालिकेत जय पराजयानंतर उलथापालथ होत आहे. त्यामुळे या स्पर्धेची रंगत आणखी वाढत जाणार आहे. असं असताना आयपीएल स्पर्धेतील सर्वात रटाळ सामना म्हणून मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू सामन्याची नोंद झाली आहे. हा सामना पाहताना कंटाळा आला, अशा प्रतिक्रिया क्रीडाप्रेमींनी सोशल मीडियावर दिल्या आहेत. वानखेडे स्टेडियमवर 12 एप्रिल 2026, रविवारी मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात सामना पार पडला. हा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने 18 धावांनी जिंकला. पण हा सामना पाहताना अक्षरश: कंटाळा आला. कारण आयपीएल स्पर्धेच्या इतिहासातील हा सर्वात वेळखाऊ सामना ठरला. या सामन्यात पाऊस किंवा सुपर ओव्हर असं काही घडलं नाही. तरी हा सामना पूर्ण होण्यासाठी 4 तास आणि 22 मिनिटांचा अवधी लागला. खरं तर हा सामना तीन तासात संपायला हवा होता. पण दीड तासांचा अतिरिक्त अवधी लागला.

बॉलिवूड चित्रपटांचा विक्रम या आयपीएल सामन्याने मोडल्याची चर्चा आता सोशल मीडियावर रंगली आहे. नुकताच प्रदर्शित झालेला धूरंदर: द रिव्हेंज हा बॉलिवूड सिनेमा तीन तास आणि 50 मिनिटांचा आहे. पण या सामन्याने हा विक्रम मोडीत काढला आणि 4 तास 22 मिनिटे घेतली. संध्याकाळी 7.30 वाजता सुरू झाला आणि रात्री 11.52 ला संपला. या सामन्यात खेळाडूंच्या दुखापती, गोलंदाजांची रणनिती, वाइड रिव्ह्यू आणि बरंच काही घडलं. त्यामुळे हा सामना क्रीडाप्रेमींच्या दृष्टीने रटाळ झाला.

Another record for the IPL. The first match which was longer than Dhurandhar 2!

— Joy Bhattacharjya (@joybhattacharj) April 12, 2026

The most boring match of the most boring IPL season ever.#LSGvsGT #IPL #IPLLive @IPL pic.twitter.com/8fC9hvzfwu

— Trivedi (@Scholesy18T) April 12, 2026

यापूर्वी कोणता सामना दीर्घकाळ चालला?

आयपीएल 2020 मध्ये मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स सामना पाच तास चालला होता. पण तेव्हा दोन सुपर ओव्हर्स टाकण्याची वेळ आली होती. त्यामुळे हा सामना संपण्यासाठी 5 तासांचा अवधी लागला. तर आयपीएल 2023 मधील अंतिम सामना पावसामुळे राखीव दिवशी खेळला गेला. तेव्हा हा सामना राखीव दिवशी तीन तासाच संपला. पण मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू सामन्यात तसा कोणताच अडथळा नव्हता. पण सर्वात वेळखाऊ ठरल्याने चर्चा होत आहे. आता आयपीएल स्पर्धेच्या सर्वात लांब चाललेला सामना म्हणून या सामन्याची नोंद झाली आहे. खरं तर टी20 हा झटपट खेळला जाणारा क्रिकेट फॉर्मेट आहे. मात्र या सामन्याने क्रीडाप्रेमींना कसोटीचा अनुभव दिला.





Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • IMD Monson Update : तीव्र उष्णता… पण पाऊस कमी की जास्त? हवामान विभागाच्या मान्सूनच्या अंदाजाने चिंता वाढली
  • Ashok Kharat | अशोक खरातचे अनेक फोन कॉल्स अन् ठाणे कनेक्शन… अंजली दमानिया करणार गौप्यस्फोट
  • MI vs RCB: आरसीबीच्या टिम डेविडला पंचांना त्रास देणं भोवलं, आयपीएल नियमानुसार बसला दणका
  • भारताने वर्ल्ड कप जिंकल्यास ऑन कॅमेरा कपडे काढून टाकेन, या बोल्ड अभिनेत्रीने केलेलं विधान
  • आता या देशाचा अमेरिकेला थेट इशारा, हल्ला झाला तर कठोर प्रतिकार करु, मरण पत्करु पण झुकणार नाही

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in