
गतविजेत्या टीम इंडियाने आयसीसी टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील आपल्या पहिल्याच सामन्यात घोर निराशा केली. भारताचे प्रमुख फलंदाज तुलनेत नवख्या यूएसए टीम विरुद्ध अपयशी ठरले. मात्र कॅप्टन सू्र्यकुमार यादव याने एकट्याने किल्ला लढवला. सूर्याने केलेल्या चिवट आणि झुंजार नाबाद खेळीच्या जोरावर भारताला 150 पार मजल मारता आली. सूर्याने वर्ल्ड कप स्पर्धेतील त्याची सर्वात मोठी खेळी केली. सूर्याने केलेल्या खेळीमुळे भारताला 20 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 161 धावा करता आल्या. टीम इंडियाने अशाप्रकारे वानखेडे स्टेडियमध्ये यूएसएसमोर 20 ओव्हरमध्ये 162 धावांचं आव्हान ठेवलं आहे. आता भारतीय गोलंदाज यूएसएला हे आव्हान गाठण्यापासून रोखणार का? हे काही तासांतच स्पष्ट होईल.
Leave a Reply