
टीम इंडियाने आयसीसी टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेतील मुख्य सामन्यांआधी धमाका केला आहे. टीम इंडियाने नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियममध्ये स्पर्धेतील 10 व्या आणि आपल्या पहिल्या सराव सामन्यात 20 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 240 धावा केल्या आहेत. भारतासाठी या सामन्यात इशान किशन याने सर्वाधिक धावा केल्या. तर काही फलंदाज हे स्फोटक खेळी करुन रिटायर्ड हर्ट होत मैदानाबाहेर गेले. आता दक्षिण आफ्रिका 241 धावांचा पाठलाग करताना भारतीय गोलंदाजीचा कसा सामना करतात? याकडे चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
19 षटकार आणि 15 चौकार
कर्णधार सूर्यकुमार यादव याने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. भारताच्या पहिल्या 8 खेळाडूंनी फलंदाजी केली. महत्त्वाची बाब म्हणजे रिंकूचा अपवाद वगळात इतर सर्व 7 फलंदाजांनी 20 पेक्षा अधिक धावा केल्या. भारताने या डावात चौकारांपेक्षा अधिक षटकार लगावले. भारताच्या 8 फलंदाजांनी एकूण 19 षटकार आणि 15 चौकार लगावले.
Leave a Reply