• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

IND vs PAK सामन्यासाठी बांगलादेशचा भारताच्या बाजूने कौल, तर पाकिस्तानने ठेवल्या तीन अटी

February 9, 2026 by admin Leave a Comment


IND vs PAK Match, T20 World Cup 2026: टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील हायव्होल्टेज सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात नियोजित आहे. हा सामना 15 फेब्रुवारीला कोलंबोत होणार आहे. पण या सामन्याकडे पाकिस्तानने पाठ फिरवली आहे. त्यामुळे हा सामना होईल की नाही हे आता सांगणं कठीण आहे. पाकिस्तान सरकारने तर भारताविरुद्ध खेळणार नाही याबाबतची घोषणा आधीच केली आहे. तर भारतीय संघ मात्र या सामन्यासाठी श्रीलंकेत जाणार आहे. त्यामुळे शेवटच्या क्षणापर्यंत काय होईल सांगता येत नाही. आशिया कप स्पर्धेतही पाकिस्तानच्या संघाने असा पवित्रा घेतला होता. खूप वेळ हॉटेलमध्ये थांबल्यानंतर सामन्यासाठी मैदानात उतरले होते. असंच काहीसं आताही होऊ शकतं. या सामन्यासाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आणि आयसीसीमध्ये खलबतं सुरू आहेत. त्यात बांग्लादेश क्रिकेट बोर्डानेही भाग घेतली आहे. या दरम्यान, बांग्लादेश क्रिकेट बोर्डाने पाकिस्तान विनंती केली आहे. त्यामुळे क्रीडाप्रेमींच्या भुवया उंचावल्या आहेत.

मिडिया रिपोर्टनुसार, बांग्लादेश क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष अमीनुल इस्लाम यांनी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसिन नकवी यांच्याशी चर्चा केली. तसेच त्यांना विनंती केली की, टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत भारताविरूद्धचा सामना खेळावा. ही विनंती त्यांनी रविवारी लाहोरमध्ये झालेल्या बैठकीत केली. यात आयसीसीचे उपाध्यक्ष आणि इमरान ख्वाजा यांची उपस्थिती होती. आता त्यांच्या विनंतीला मान देऊन पाकिस्तान खेळणार की नाही हे अजून अस्पष्ट आहे. कारण बांगलादेशला या स्पर्धेतून वगळल्यानंतर पाकिस्तानने आक्रमक पवित्रा घेतला होता. इतकंच काय तर पाकिस्तानने भारताविरूद्धच्या सामना खेळणार नसल्याचं स्पष्ट केलं होतं. आता भारत पाकिस्तान वाद वाढू नये यासाठी बांगलादेशने पावलं उचलली आहेत. बांगलादेशने विनंती केल्याने पाकिस्तानचा राग थंड होऊ शकतो.

पाकिस्तानने ठेवल्या तीन अटी

मिडिया रिपोर्टनुसार, पाकिस्तानने या वादात आपली पोळी शेकण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. गेल्या काही वर्षात भारत पाकिस्तान द्विपक्षीय मालिका झाल्या नसल्याने पीसीबीचं मोठं नुकसान झालं आहे. असं असताना तीन अटी आयसीसीपुढे ठेवल्या आहेत. पाकिस्तानला आयसीसीकडून जास्त मानधन हवं आहे. तसेच भारत पाकिस्तान द्विपक्षीय मालिका सुरू कराव्या. तसेच टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी हँडशेक करावा अशा तीन अटी ठेवल्या आहेत.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • 19 व्या वर्षी कशी दिसायची जीनत अमान, 70 च्या दशकातील अभिनेत्रीचे 15 बोल्ड फोटो व्हायरल
  • Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली मोठं कांड.. वाचून पायाखालची वाळूच सरकेल
  • बापरे! अशोक खरातची भविष्यवाणी खरी ठरणार? दिल्लीत मोठ्या हालचाली, नेमंक काय घडतंय?
  • Bigg Boss Marathi 6: ग्रँड फिनालेपूर्वी ‘हा’ लोकप्रिय स्पर्धक बिग बॉस मराठीच्या घराबाहेर; चाहत्यांना बसला धक्का!
  • बॉलिवूडमध्ये खळबळ उडवणारं आशा भोसले यांचं वादग्रस्त गाणं, वादानंतरही ठरलं सुपरहिट

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in