• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

IND vs PAK : पाकविरुद्ध हाय व्होल्टेज सामना, पण टीम इंडिया संकटात, टेन्शन वाढलं.. काय झालं ?

February 13, 2026 by admin Leave a Comment

IND vs PAK, T20 World Cup 2026 : टी20 वर्ल्ड कप 2026 मध्ये येत्या रविवारी म्हणजेच 15 फेब्रुवारीला भारत-पाकिस्तान हा हाय-व्होल्टेज सामना रंगणा आहे. कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडियम वर दोन्ही संघ एकमेकांविरुद्ध खेळतील. राजकीय वाद आणि बॉयकॉ करण्याची धमकी यामुळे ही मॅच पहिल्यापासूनच चर्चेत आहे. मात्र अखेर 15 तारखेला हा सामना खेळवला जाणार आहे. असं असलं तरीही या हाय-व्होल्टेज सामन्यात टीम इंडियासमोर काही आव्हाने आहेत. नामिबियाविरुद्ध अलिकडेच मिळालेल्या विजयानंतरही, टीम इंडिया अडचणीत सापडू शकते, त्याची 4 प्रमुख कारणं आहेत.

अभिषेक शर्माच्या फिटनेसबद्दल अनिश्चिती

भारतीय संघातील स्फोटक सलामीवीर अभिषेक शर्मा पोटाच्या संसर्गाशी झुंजत आहे. पहिल्या सामन्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, ज्यामुळे त्याला नामिबियाविरुद्धच्या सामन्याला मुकावे लागले. मात्र, त्याला आता रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे आणि टीम मॅनेजमेंट सतर्क आहे. कर्णधार सूर्यकुमार यादवने असेही संकेत दिले की शर्माला परतण्यासाठी आणखी एक किंवा दोन सामने लागू शकतात. अशा परिस्थितीत, जर अभिषेक शर्मा पाकिस्तानविरुद्ध खेळला नाही तर संघाचा ताण वाढू शकतो.

रिंकू सिंगचा खराब फॉर्म

मधल्या फळीत फिनिशरची भूमिका बजावणाऱ्या रिंकू सिंगने या स्पर्धेत आतापर्यंत चांगली कामगिरी केलेली नाही. स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात त्याने 14 चेंडूत फक्त 6 धावा काढल्या. या काळात त्याने एकही फोर किंवा सिक्सर मारली नाही.  तर दुसऱ्या सामन्यात, तो 6 चेंडूत फक्त 1 धाव काढू शकला, ही टीम इंडियासाठी मोठी चिंतेची बाब आहे. रिंकू सहसा त्याच्या स्फोटक फलंदाजीसाठी ओळखली जातो, परंतु सध्या त्याची बॅट शांत असल्याचे दिसते.

स्पिनर्ससमोर फलंदाज अडचणीत

नामिबियाविरुद्धच्या सामन्यात भारताने 209 धावा केल्या, पण मधल्या षटकांमध्ये फिरकी गोलंदाजांसमोर ते फसले. नामिबियाचा फिरकीपटू बर्नार्ड स्कोल्झ आणि गेरहार्ड इरास्मस यांनी विकेट घेतल्या आणि मधल्या षटकांमध्ये भारताची घोडदौड रोखली. याचा अर्थ असा की स्पिनर्ससमोर भारतीय फलंदाजांचा कमकुवतपणा पुन्हा एकदा उघड झाला. पाकिस्तानकडे मजबूत स्पिन अटॅक आहे आणि कोलंबोची खेळपट्टी फिरकीला अनुकूल असू शकते, ही बाब टीम इंडियासाठी एक मोठा धोका ठरू शकते.

पॉवरप्लेमध्ये गोलंदाजीची कमजोरी

पॉवरप्लेमध्ये नामिबियाने जलद सुरुवात केली आणि भारताचे गोलंदाज सुरुवातीलाच खूप महागडे ठरले. पॉवरप्लेमध्ये धावा दिल्याने संघाला सुरुवातीलाच मोठा धक्का बसला. नामिबियाने पहिल्या सहा षटकांत 1 गडी गमावून 57 धावा केल्या. पाकिस्तानविरुद्ध पॉवरप्ले महत्त्वाचा ठरू शकतो, तिथे त्यांचे सलामीवीर आक्रमक खेळ करू शकतात. भारतीय गोलंदाजांना त्यांच्यावर चांगलं नियंत्रण ठेवणं खूप गरजेचं आहे, अन्यथा पाकिस्तानी संघ मोठी धावसंख्या उभारू शकतो.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • RR vs RCB : वैभवची विस्फोटक खेळी, राजस्थानचा विजयी चौकार, आरसीबीचा 6 विकेट्सने धुव्वा
  • होम लोन घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! एप्रिल 2026 मध्ये ‘या’ सरकारी बँका देताहेत सर्वात स्वस्त कर्ज
  • Cars Under 5 Lakh : पहिल्यांदा कार घेणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी! 5 लाखांच्या बजेटमध्ये घरी आणा ‘या’ दमदार कार
  • विमानतळावर ३८ कोटींचे ३० किलो सोने जप्त, २४ महिलांनी कुठे-कुठे लपवले सोने ?
  • IPL 2026 : आयपीएल स्पर्धेत वेगवान अर्धशतक करणारे भारतीय फलंदाज, नंबर 1 कोण?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in