
टीम इंडियाने आयसीसी अंडर 19 वर्ल्ड कप 2026 स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक दिली आहे. टीम इंडियाने बुलावायो स्पोर्ट्स क्लबमध्ये खेळवण्यात आलेल्या सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा धुव्वा उडवत सेमी फायनलमध्ये धडक दिली. भारताची या स्पर्धेत सेमी फायनलमध्ये पोहचण्याची ही सलग सलग सहावी वेळ ठरली. भारताने पाकिस्तानसमोर 253 धावांचं आव्हान ठेवलं होतं. पाकिस्तानला उपांत्य फेरीत पोहचण्यासाठी नेट रनरेटच्या हिशोबाने हे आव्हान 33.3 ओव्हरमध्ये पूर्ण करायचं होतं. मात्र पाकिस्तानच्या फलंदाजांनी भारतीय गोलंजदाजांसमोर गुडघे टेकले. भारताने पाकिस्तानला 22 बॉलआधीच गुंडाळलं. भारताने पाकिस्तानला 46.2 ओव्हरमध्ये 194 रन्सवर ऑलआऊट केलं. भारताने अशाप्रकारे विजय मिळवला. भारताचा हा या स्पर्धेतील एकूण आणि सलग पाचवा विजय ठरला.
Leave a Reply