
वूमन्स टीम इंडिया सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. टीम इंडिया या दौऱ्यात सध्या टी 20i मालिका खेळत आहे. त्यानंतर उभयसंघात टी 20i मालिकेनंतर वनडे सीरिज खेळवण्यात येणार आहे. त्यानंतर एकमेव कसोटी सामन्याचा थरार रंगणार आहे. सध्या टीम इंडिया या 3 सामन्यांच्या टी 20i मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे. त्यामुळे भारताला सलग दुसरा सामना जिंकून मालिकेवर नाव कोरण्याची संधी आहे. यजमान संघाची सुरुवात पराभवाने झाली. त्यामुळे आता मालिकेतील आव्हान कायम राखण्यासाठी ऑस्ट्रेलियाला दुसऱ्या सामन्यात कोणत्याही स्थितीत विजय मिळवावा लागणार आहे. त्यामुळे दुसर्या सामन्यात कांगारुंचा चांगलाच कस लागणार आहे. त्यामुळे या सामन्यात यजमान पाहुण्या संघासमोर कशी कामगिरी करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
Leave a Reply