
टीम इंडियाने आयुष म्हात्रे याच्या नेतृत्वात आयसीसी अंडर 19 वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील अंतिम फेरीत धडक दिली आहे. टीम इंडियाने उपांत्य फेरीतील दुसऱ्या सामन्यात अफगाणिस्तानवर 7 विकेट्स मात केली आहे. अफगाणिस्तानने टीम इंडियासमोर 311 धावांचं आव्हान ठेवलं होतं. भारताने हे आव्हान 53 बॉलआधी पूर्ण केलं. भारताने 41.1 ओव्हरमध्ये 3 विकेट्स गमावून हे आव्हान पूर्ण केलं. भारताची ही अंतिम फेरीत पोहचण्याची सलग सहावी आणि एकूण दहावी वेळ ठरली. अॅरॉन जॉर्ज हा भारताच्या विजयाचा शिल्पकार ठरला. अॅरॉनने शतक झळकावलं. तर कर्णधार आयुष म्हात्रे आणि वैभव सूर्यवंशी या स्टार जोडीने अर्धशतक झळकावत भारताच्या विजयाचा पाया रचला. तसेच इतर फलंदाजांनीही योगदान दिलं. आता वर्ल्ड कप ट्रॉफीसाठी टीम इंडिया अंतिम सामन्यात इंग्लंड विरुद्ध भिडणार आहे.
Leave a Reply