
या वर्षी होळी सणाच्या दरम्यानच चंद्रग्रहण लागणार आहे. 3 मार्च रोजी संध्याकाळी हे चंद्रग्रहण चालू होणार असून ते काही काळासाठी भारतातही दिसेल. यावेळी चंद्रग्रहणाचा अनेक राशींवर मोठा परिणाम पडणार आहे. (फोटो सौजन्य- मेटा एआय)
भारतात 3 मार्च रोजी चंद्रग्रहण सुरू होईल. संध्याकाळी 5 वाजून 59 मिनिटांनी सुरू होणार असून तो 6 वाजून 47 मिनिटांपर्यंत राहणार आहे. या काळात काही राशीच्या लोकांनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. काही राशींवर संकट येण्याची शक्यता आहे. (फोटो सौजन्य- मेटा एआय)
या चंद्रग्रहणाच्या काळात मेष, कन्या, मकर राशीच्या लोकांवर एखादं संकट येऊ शकतं. मेष राशीच्या लोकांना मानसिक चिंता लागू शकते. तर कन्या राशीच्या लोकांचे आर्थिक नुकसान होऊ शकते. मकर राशीच्या लोकांना या ग्रहणानंतर एखादा आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. (फोटो सौजन्य- मेटा एआय)
या आजारातून पुढे मृत्यूही ओढावू शकतो त्यामुळे मेष, कन्या, मकर या राशीच्या लोकांनी यावेळी चंद्रग्रहण पाहून नये असे सांगितले जात आहे. ग्रहण संपल्यानंतर या राशीच्या लोकांनी स्नान जरून करावे. एकदा ग्रहण संपल्यानंतर या राशींवरील संकटही कमी होईल. परंतु चंद्रग्रहणादरम्यान लोकांनी काळजी घेणे गरजेचे आहे. चंद्रग्रहण सुरु होण्याआधी मंदिराचा दरवाजा बंद करून घ्यावा. तसेच चंद्रग्रहण संपल्यानंतर दरवाजा उघडवा.(फोटो सौजन्य- मेटा एआय)
Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या. (फोटो सौजन्य- मेटा एआय)




Leave a Reply