• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Heat Red Alert : जगात भयानक उष्णता वाढणार, ऑक्सफोर्डने दिला इशारा, भारतात काय होणार ?

February 1, 2026 by admin Leave a Comment


लंदन:जगात अनेक ठिकाणी हाडे गोठवणारी थंडी पडली आहे. परंतू आता उन्हाळ्यात देखील भयंकर उष्णता वाढण्याचा इशारा देण्यात आला आहे. ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीच्या ताज्या संशोधनातून नवीन माहिती उघड झाली आहे. 2026 चा नवा धोकादायक रिपोर्ट जारी झाला आहे. साल 2050 पर्यंत जगातील 40 टक्के लोकसंख्या म्हणजे जवळपास 4 अब्ज लोक अशा उष्णतेला झेलण्यास मजबूर होतील. हे तापमान सहन करणे मनुष्यांच्या क्षमते पलिकडे आहे. या अहवालात भारतासाठी देखील इशारा देण्यात आला आहे. असा उन्हाळा येणार आहे की पृथ्वीचे पाणी उकळण्याची वेळ येणार आहे.

भारतात काय होणार ?

ऑक्सफोर्डच्या संशोधकांच्या मते भारतासाठी ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे. अहवालानुसार भारत, नायजेरिया आणि इंडोनेशिया त्या देशात सर्वात पुढे आहे जेथे उष्णता सर्वात भयानक रुप धारण करणार आहे. असा दावा केला जात आहे की पारा 45 ते 50 डिग्री सेल्सियस पार करणार आहे. त्यामुळे मानवाचे शरीराच्या अवयवयांना आतून थंड ठेवणे अशक्य होणार आहे. भारतातील कोट्यवधीची लोकसंख्येकडे एअर कंडीशनिंगसारखी सुविधा नाही.तसेच सुरक्षित घरे नाहीत त्यामुळे गरीबांची अवस्था अत्यंत बिकट होणार आहे. संशोधकांनी दावा केला आहे की येणाऱ्या दशकात उकाड्याने होणाऱ्या मृत्यूंची संख्येत एक प्रकारची सुनामी येण्याची शक्यता आहे.

2010 मध्ये केवळ 1.5 अब्ज लोक या संकटात होते, परंतू 2050 पर्यंत ही संख्या दुप्पट होणार आहे. आपण एका अशा वातावरणाकडे जाणार आहोत ज्याची ओळख केवळ आग आणि धुर असणार आहे.

घरे गॅस चेंबर होतील

तुम्हाला वाटत असेल की या उकाड्यापासून रशिया, कॅनडा वा फिनलँड सारखे थंड देश सुरक्षित आहे, तर ही तुमची मोठी चुक आहे.कारण या देशात घरे गर्मी शोषणासाठी आणि थंडीपासून बचावासाठी तयार केलेली आहेत. त्यामुळे जसजसे तापमानात वाढ होईल तसतसे ही घरे गॅस चेंबरमध्ये परिवर्तित होतील. येथील वाहतूक आणि आरोग्य यंत्रणा भीषण उष्णतेसाठी तयार नाही.

मोठ्या प्रमाणावर स्थलांतर

ऑक्सफोर्डच्या संशोधक राधिका खोसला यांनी सावधान करताना सांगितले की 1.5 डिग्रीची सीमा मर्यादा पार होताच. आरोग्य आणि शेती सर्वकाही नष्ट होऊन जाईल. अन्न आणि पाण्याचे संकट येईल. पिके एकतर जळतील किंवा पाण्यावाचून मरतील. कोट्यवधी लोक रहाण्या लायक जागा शोधण्यासाठी त्यांची घरे सोडतील. मोठ्या प्रमाणावर स्थलांतर घडून येईल.

 



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Horoscope February : 3 राशींच्या आयुष्यात नवं संकट, कोणाला मिळणार मोठी संधी? वाचा काय-काय घडणार?
  • गौतम अदानी शरद पवारांच्या भेटीला, सिल्व्हर ओकवर नेमकं काय घडतंय?
  • CCTV कॅमेऱ्याची दिशा बदलली, दरवाजा, खिडकीची कडी तुटली..; निर्माता साजिद नाडियादवालाच्या बंगल्यात अज्ञातांचा प्रवेश अन्..
  • Budget 2026 सुरु होताच शेअर बाजारात दिवाळी, ‘या’ कंपन्यांच्या शेअर्समध्ये लक्षणीय वाढ… निफ्टी आणि सेन्सेक्सचे ‘अच्छे दिन’
  • Budget 2026 : आता शाळेतच मिळणार रिल्स बनवण्याचे धडे, कंटेंट क्रिएशनसाठी सरकारची नवी योजना काय?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in