• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Gudi Padwa 2026: गुढी पाडव्याच्या दिवशी का खातात कडुनिंबाची पानं?, फार कमी लोकांना माहीत असेल हे कारण

March 22, 2026 by admin Leave a Comment


Hindu Nav Varsh 2026 : हिंदू धर्मात नवं संवत्सर म्हणजेच हिंदू नववर्षाची सुरूवात खूप खास, महत्वाची मानली जाते. दर वर्षी चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदेला तिथीने हिंदू नव वर्ष सुरू होतं. तोच दिवस गुढी पाडवा म्हणून साजरा केला जातो. यंदा गुढी पाडवा हा गुरूवारी, 19 मार्च रोजी येणार आहे. याच दिवसापासून विक्रम संवत्सर 2083 सुरू होणार आहे. आणि या वर्षी गुढी पाडवा गुरूवारी येत असल्यानेदेवांचा गुरु बृहस्पति हा या नवीन वर्षाचा राजा मानला जाईल.

ज्योतिषशास्त्रानुसार नवीन वर्षं ज्या दिवशी येतं, तो दिवस ज्या ग्रहाचा असतो, तो ग्रह त्याचा राजा मानला जातो. या नवीन वर्षाचा अधिपती मंगळ असेल. महाराष्ट्रात हिंदू नववर्षाच्या दिवशी गुढीपाडवा साजरा केला जातो. या दिवशी मराठी नववर्षाची सुरुवात होते. लोक भल्या पहाटे उठून स्नान करतात आणि गुढी उभारून, तिची पूजा करून, नैवेद्य दाखवतात. मात्र याच दिवशी अनेक ठिकाणी कडुलिंबाची पाने खाण्याची परंपरा आहे, हे तुम्हाला माहीत आहे का. गुढी पाडव्याच्या साची सुरूवता कडू अशी पानं खाऊ का करतात, त्या मागे काय शास्त्र् आहे ? चला जाणून घेऊया.

कडुनिंबाची पानं खाण्याची परंपरा

भारतातील अनेक भागात हिंदू नववर्षाच्या दिवशी कडुलिंबाची पाने खाल्ली जातात. विशेषतः महाराष्ट्रात गुढी पाडव्याच्या दिवशी आणि आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि कर्नाटकात उगादीच्या वेळी लोक या दिवशी कडुलिंबाची पानं आवर्जून खातात. अनेक ठिकाणी कडुलिंबाची पानं ही गूळ, चिंच किंवा कैरीसोबतही मिसळून खाल्ली जातात. धार्मिक मान्यतेनुसार, नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी कडुलिंबाची पाने खाणं म्हणजे, जीवनातील गोड आणि कडू अनुभवांचा स्वीकार करण, त्यांना सामरो जाणं, असं प्रतीक मानलं जातं.

कडूनिंबाची पानं खाण्याचे फायदे

कडूनिंबाची पाने आपण स्वतःलाच एका प्रकारे संदेश देतो, की येणारं हे नवं वर्ष आनंद-दु:ख, यश आणि आव्हानांनी भरलेलं असू शकतं. आपण कोणत्याही परिस्थितीसाठी तयार असलं पाहिजे. शिवाय, ही परंपरा आरोग्याशी देखील जोडलेली आहे. हिंदू नववर्ष सामान्यतः वसंत ऋतूमध्ये येते, तेव्हा हवामान बदलतं. यावेळी, संसर्ग आणि ॲलर्जीचा धोका वाढतो. कडुलिंबाची पाने खाल्ल्याने शरीर शुद्ध होते आणि रोगांपासून संरक्षण होते असं मानलं जातं.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)



Source link

Filed Under: lifestyle

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • दर आठवड्याला ८० हजार लोक एलपीजी ते पीएनजीमध्ये कन्व्हर्ट, तीन महिन्यांचा तो नियम काय ?
  • Chanakya Niti : या तीन गोष्टी आहेत माणसाच्या सर्वात मोठ्या शत्रू, हळुहळु व्यक्तीला संपवून टाकतात
  • Vastu Shastra : तुम्हाला वारंवार नजर लागते? मग घरातून बाहेर पडताना सतत सोबत ठेवा या तीन वस्तू
  • PBKS vs SRH : सनरायझर्स हैदराबाद आणि पंजाब किंग्स भिडणार, हेड टू हेड आकडेवारी जाणून घ्या
  • Vastu Shastra : तांदूळ, हळद आणि दिव्याचे हे सोपे उपाय तुमच्या घरात आणतील सुख, शांती; सर्व समस्या होतील दूर

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in